शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससमोर जागा राखण्याचे आव्हान

By admin | Updated: October 4, 2014 23:27 IST

गेल्या दोन निवडणुकांपासून आरमोरी विधानसभा मतदार संघ काँग्रेसने आपल्या ताब्यात राखला आहे. तर २००९ च्या निवडणुकीत भाजपचा गड असलेला गडचिरोली विधानसभा मतदार संघ

गडचिरोली : गेल्या दोन निवडणुकांपासून आरमोरी विधानसभा मतदार संघ काँग्रेसने आपल्या ताब्यात राखला आहे. तर २००९ च्या निवडणुकीत भाजपचा गड असलेला गडचिरोली विधानसभा मतदार संघ काँग्रेसने ९६० मतांनी भाजपकडून खेचून आणला आहे. हे दोनही विधानसभा मतदार संघ आगामी निवडणुकीतही आपल्याकडे राखून ठेवण्याचा मोठे आव्हान काँग्रेस पक्षासमोर आहे. मात्र या निवडणुकीत सुरूवातीपासूनच काँग्रेसमध्ये नाराजीचे सत्र, रूसवा-फुगवा राजकारण जोर पकडून आहे. त्यामुळे काँग्रेस हे आव्हान कितपत पेलून धरते, याविषयी मतदारांसह काँग्रेस नेत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.नवरात्र प्रारंभ होताच काँग्रेस पक्षाची यादी जाहीर झाली. पहिल्याच यादीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसची उमेदवारी सगुणा पेंटारामा तलांडी तर आरमोरीची उमेदवारी विद्यमान काँग्रेस आमदार आनंदराव गेडाम यांना जाहीर झाली व त्याचबरोबर गटबाजीचे राजकारण सुरू झाले. आजवर आरमोरी विधानसभा क्षेत्र व काँग्रेस यांचे समिकरण म्हणजे पोरेड्डीवार गट असे जुळलेले होते. ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या पुढाकाराने आनंदराव गेडाम हे निवडणुकीच्या रिंगणात मागील १० वर्षांपासून मैदान मारत आले आहे. यावेळी पहिल्यांदा आनंदराव गेडाम एकट्याने काँग्रेसचा किल्ला लढत आहे. त्यांच्यासोबत त्यांनी मागील १० वर्षात निर्माण केलेले कार्यकर्ते आहेत. यांच्या भरवशावर त्यांची निवडणुकीची मदार आहे. दुसरीकडे पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे व ओबीसींच्या कमी झालेल्या आरक्षणामुळे आरमोरी तालुक्यातील गैरआदिवासी मतदार काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही कंटाळलेला आहे. या साऱ्यांनी मिळून आजवर आपल्यावर अन्यायच केला. याचा पाढा वाचल्या जात आहे. त्यामुळे या साऱ्या राजकीय पक्षांना पर्याय शोधण्याचे काम तो करू लागला आहे. मागील १० वर्षापासून काँग्रेसचे आमदार या मतदार संघात आहे. त्यामुळे येथील जागा टिकविण्याचे पक्षासमोर मोठे आव्हान आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्राची जागा गेल्या निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसने आपल्या पदरात पाडून घेतली व गेल्या ५ वर्षात काँग्रेसने सरकारच्या माध्यमातून जोरदार कामही केले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने आपला उमेदवार बदलविला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे कारण देत काँग्रेसने ही कृती केली. मात्र येथे नवा उमेदवार देतांना येथील सर्व गटांना विश्वासात घेतले नाही, असे आता दिसून येत आहे. एकाला पकडले तर दुसरा रूसतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर सलग तीन दिवसात तीन जिल्हाध्यक्ष बदलविण्याचे धाडस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. याचेही परिणाम या निवडणुकीवर पडत आहे.अध्यक्षपदावरून उचलबांगडी करताच प्रकाश अर्जुनवार यांनी पक्षत्याग करून टाकला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजर असलेले माजी खासदार मारोतराव कोवासे प्रकृतीच्या कारणामुळे प्रचारापासून दूर आहे. तर काँग्रेसचा जि. प. तील गटनेता शिवबंधन बांधून मैदानात उभा आहे. काँग्रेसच्या एक महिला दुसऱ्या राजकीय पक्षाकडून रिंगणात आहे. या साऱ्या अडचणीचा सामना करत नवे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात आता सगुणा तलांडींना मैदानात लढाई लढायची आहे. उसेंडी त्यांच्या प्रचारासाठी भिडले हा त्यांच्यासाठी दिलासा असला तरी समोर तगडे आव्हान आहे. या परिस्थितीत काँगे्रसला आपले प्राबल्य कायम राखणे मोठे आव्हान राहणार आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने १९८० व १९९० मध्ये विजय मिळविला होता. १९८० मध्ये पेंटारामा तलांडी प्रतिस्पर्धाचा उमेदवारी अर्ज रद्द झाला म्हणून अविरोध निवडून आले होते. तर १९९० मध्ये धर्मरावबाबा आत्राम यांच्या रूपाने काँग्रेसला ही जागा मिळाली होती. त्यानंतर कधीही काँग्रेस येथे यश मिळवू शकली नाही. मागील १५ वर्षापासून या भागातून विधानसभा निवडणुकीत पंजा आघाडीच्या राजकारणामुळे गायबच होता. यंदा पुन्हा काँग्रेस मुक्तेश्वर गावडेच्या रूपाने मैदानात आहे. काँग्रेसची या भागात १५ ते २० हजाराची व्होटबँक आहे. त्यामुळे काँग्रेस येथे इतर राजकीय पक्षांना निश्चितपणे धक्का देऊ शकते, एवढ्या ताकतीत आहे. सिरोंचा पंचायत समितीवर मागील १५ वर्षापासून काँग्रेसचे प्राबल्य आहे. भामरागड तालुका बहादुरशहा आलाम यांच्या मृत्यूपर्यंत काँग्रेसचा गड होता. कधीही या भागात भाजपचा शिरकावही झाला नव्हता. परंतु स्थानिक पातळीवर काँग्रेस नेतृत्व हरविल्याने भामरागड तालुक्यात कमळ बहरले. त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातही काँग्रेससाठी संधी मोठी आहे.