शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

दोषींवर कारवाई होणार

By admin | Updated: March 18, 2015 01:42 IST

जिल्हा परिषदेंतर्गत ३१ मे २०१३ नंतर तब्बल २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या करण्यात आल्याचे प्रकरण शासनस्तरावर पोहोचले.

गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत ३१ मे २०१३ नंतर तब्बल २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या करण्यात आल्याचे प्रकरण शासनस्तरावर पोहोचले. चौकशीदरम्यान बोगस शिक्षक बदली प्रकरणात दोषी आढळून आलेल्या अधिकाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजाविण्यात आली असून शासनस्तरावर या प्रकरणी कारवाई सुरू असल्याची माहिती राज्याच्या ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात १६ मार्च रोजी दिली. गडचिरोली जिल्हा परिषदेत ३१ मे २०१३ नंतर २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या करून त्याचे आदेश काढण्यात आले. याबाबतचा अहवाल जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाला २०१४ च्या एप्रिल महिन्यात सादर केला. या बोगस बदली प्रकरणाची चौकशीअंती दोषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या बदली प्रकरणात दोषी आढळून आलेल्या अधिकारी व शिक्षकांवर शासनस्तरावरून कारवाई सुरू आहे. या प्रकरणाबाबत लोकप्रतिनिधींच्या सुध्दा तक्रारी शासनाला प्राप्त झालेले आहे, अशी माहिती ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.आमदार नागो गाणार, आमदार प्रा. अनिल सोले, सुनिल देशमुख यांनी ६५०१ क्रमांकाचा बोगस बदली प्रकरणाबाबतचा तारांकित प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. (स्थानिक प्रतिनिधी)