शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

९२ ग्रा. पं. ना कनेक्टिव्हिटी

By admin | Updated: November 2, 2015 01:11 IST

केंद्र शासनाने देशातील प्रत्येक ग्राम पंचायतीला इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

गडचिरोली : केंद्र शासनाने देशातील प्रत्येक ग्राम पंचायतीला इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सहा पंचायत समितीमधील ९२ ग्राम पंचायतींपर्यंत केबल टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या ग्राम पंचायतींना लवकरच नेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.
सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. याअंतर्गतच ग्रामसभांना सर्वोच्च अधिकार बहाल करण्यात आले आहेत. अनेक ग्रामसभा गावाच्या हिताच्या दृष्टीने नियोजन करीत असल्याने गावांचा कायापालट झाला आहे. त्यामुळे आता ग्राम पंचायतीचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदान थेट ग्राम पंचायतीच्या खात्यात जमा करण्याचे धोरणही शासनाने अवलंबिले आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे होते की नाही, त्याचबरोबर ग्रा. पं. चा कारभार गतिमान करण्यासाठी शासनाने देशभरातील सर्व ग्राम पंचायती नेट कनेक्टिव्हीटीने जोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
देशातील सर्वच ग्राम पंचायती आॅप्टीकल फायबरने जोडण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सध्य:स्थितीत एकूण ४५७ ग्राम पंचायती आहेत. या सर्व ग्राम पंचायती आॅप्टीकल फायबरने जोडण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा या तालुक्यांमधील ग्राम पंचायती जोडण्याचे काम सुरू झाले आहे. या सहा तालुक्यांमध्ये एकूण २४२ ग्राम पंचायती आहेत. यापैकी आरमोरी तालुक्यात ३१, चामोर्शी तालुक्यात ८२, देसाईगंज तालुक्यात १९, गडचिरोली तालुक्यात ५४, कुरखेडा तालुक्यातील ४५ व मुलचेरा तालुक्यातील ११ ग्राम पंचायती पहिल्या टप्प्यात जोडण्यात येणार आहेत. सहा तालुक्यातील २४२ ग्राम पंचायतींपैकी ९२ ग्राम पंचायतींपर्यंत केबल पोहोचविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. १६८ किमी केबल टाकण्याचे काम पूर्ण होणार आहे. दुसरा टप्पा डिसेंबरनंतर सुरू होईल व जूनपर्यंत सर्व ग्राम पंचायतींना आॅप्टीकल केबलने जोडण्यात येणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
ब्राँडबँडपेक्षा ५० पट अधिक स्पिड
ग्राम पंचायतीला इंटरनेट कनेक्टिव्हीटी देण्यासाठी आॅप्टीकल फायबरचा वापर केला जात आहे. आॅप्टीकल फायबरमध्ये काचाचा वापर केला जात असून त्यातून प्रकाश पाठविला जातो. दूरसंचारमधील हे अत्याधुनिक साधन आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या ब्राँडबँडसाठी कॉपर फायबरचा वापर केल्या जातो. या केबलची स्पिड केवळ दोन एमबीबीएस एवढी आहे. तर ग्राम पंचायतीसाठी वापरण्यात येत असलेल्या आॅप्टीकल फायबरची स्पिड १०० एमबीपीएस एवढी आहे.

कारभार गतिमान होण्यास मदत
प्रत्येक ग्राम पंचायत आॅनलाईन पद्धतीने जोडल्या गेल्यामुळे ग्राम पंचायतीच्या प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता येण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर ग्राम पंचायतीची माहिती राज्य व केंद्र शासनाला एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ग्राम पंचायतीची कार्यालयीन माहिती पाठविण्यासाठी कागदी घोडे नाचवावे लागत होते. यामध्ये बराच श्रम, पैसा, वेळ खर्च होत होता. कनेक्टिव्हीटीनंतर एका मिनिटात माहिती उपलब्ध होणार आहे.