शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

८६ किमी राष्ट्रीय मार्गांची होणार दुरूस्ती

By admin | Updated: November 7, 2016 01:51 IST

गडचिरोली जिल्ह्यातून चार प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जात असून या राष्ट्रीय महामार्गांची पावसामुळे दुरवस्था झाली.

निविदा प्रक्रिया सुरू : जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात होणार कामाला सुरूवातगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून चार प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जात असून या राष्ट्रीय महामार्गांची पावसामुळे दुरवस्था झाली. त्यामुळे २०१६-१७ मध्ये ८६.५ किमी रस्ते दुरूस्त करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली, गडचिरोली-सिरोंचा, मूल-धानोरा हे राज्य महामार्ग होते. मात्र मागील वर्षी केंद्र शासनाने या मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये केला आहे. त्यामुळे या महामार्गांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १३० टक्के पाऊस झाला. संततधार पावसामुळे डांबरी रस्त्यावरील डांबर उखडून गेले. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ते नुतनीकरणाच्या कामाला जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून सुरूवात होते. तोपर्यंत खड्डे बुजवून मार्ग चालवावा लागतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. या अंतर्गतच गडचिरोली शहरातील खड्डे बुजविण्यात आले होते. रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने सदर रस्त्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ८६ किमीच्या रस्त्यांचे नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५०० किमीपेक्षा अधिक आहे. यापैकी केवळ ८६.५ किमीचे नुतनीकरण केले जाणार आहे. म्हणजेच उर्वरित मार्गांची स्थिती आहे तशीच राहणार आहे. चार प्रमुख मार्गांचे ११ भागांमध्ये विभाजन करून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेची कामे सुरू असल्याने किमान ८६.५ किमी लांबीचे रस्ते दुरूस्त होतील, अशी आशा आहे.६८.९३ कोटींचा निधी मंजूरस्थानिक राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने आरमोरी-गडचिरोली दरम्यानचे १० किमी, गडचिरोली-तळोधी दरम्यान १०.५ किमी, आष्टी ते आलापल्ली दरम्यान २२ किमी, तळोधी ते आष्टी दरम्यान १५.५ किमी, आलापल्ली ते सिरोंचा दरम्यान २८.५ किमी रस्तयाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी एकूण ६८.९३ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. दुरूस्तीचे प्रस्ताव कार्यालयाने शासनाकडे सादर केले होते. या प्रस्तावांना मंजुरी प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर निधी सुध्दा उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रीय महामार्गांचे नवीन बांधकाम होईपर्यंत जुन्याच रस्त्यांची डागडुजी करून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग नवीन बांधण्यास पुढील एक ते दोन वर्ष लागणार आहेत.