शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

८६ किमी राष्ट्रीय मार्गांची होणार दुरूस्ती

By admin | Updated: November 7, 2016 01:51 IST

गडचिरोली जिल्ह्यातून चार प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जात असून या राष्ट्रीय महामार्गांची पावसामुळे दुरवस्था झाली.

निविदा प्रक्रिया सुरू : जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात होणार कामाला सुरूवातगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून चार प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जात असून या राष्ट्रीय महामार्गांची पावसामुळे दुरवस्था झाली. त्यामुळे २०१६-१७ मध्ये ८६.५ किमी रस्ते दुरूस्त करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली, गडचिरोली-सिरोंचा, मूल-धानोरा हे राज्य महामार्ग होते. मात्र मागील वर्षी केंद्र शासनाने या मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये केला आहे. त्यामुळे या महामार्गांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १३० टक्के पाऊस झाला. संततधार पावसामुळे डांबरी रस्त्यावरील डांबर उखडून गेले. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ते नुतनीकरणाच्या कामाला जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून सुरूवात होते. तोपर्यंत खड्डे बुजवून मार्ग चालवावा लागतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. या अंतर्गतच गडचिरोली शहरातील खड्डे बुजविण्यात आले होते. रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने सदर रस्त्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ८६ किमीच्या रस्त्यांचे नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५०० किमीपेक्षा अधिक आहे. यापैकी केवळ ८६.५ किमीचे नुतनीकरण केले जाणार आहे. म्हणजेच उर्वरित मार्गांची स्थिती आहे तशीच राहणार आहे. चार प्रमुख मार्गांचे ११ भागांमध्ये विभाजन करून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेची कामे सुरू असल्याने किमान ८६.५ किमी लांबीचे रस्ते दुरूस्त होतील, अशी आशा आहे.६८.९३ कोटींचा निधी मंजूरस्थानिक राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने आरमोरी-गडचिरोली दरम्यानचे १० किमी, गडचिरोली-तळोधी दरम्यान १०.५ किमी, आष्टी ते आलापल्ली दरम्यान २२ किमी, तळोधी ते आष्टी दरम्यान १५.५ किमी, आलापल्ली ते सिरोंचा दरम्यान २८.५ किमी रस्तयाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी एकूण ६८.९३ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. दुरूस्तीचे प्रस्ताव कार्यालयाने शासनाकडे सादर केले होते. या प्रस्तावांना मंजुरी प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर निधी सुध्दा उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रीय महामार्गांचे नवीन बांधकाम होईपर्यंत जुन्याच रस्त्यांची डागडुजी करून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग नवीन बांधण्यास पुढील एक ते दोन वर्ष लागणार आहेत.