शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

८६ किमी राष्ट्रीय मार्गांची होणार दुरूस्ती

By admin | Updated: November 7, 2016 01:51 IST

गडचिरोली जिल्ह्यातून चार प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जात असून या राष्ट्रीय महामार्गांची पावसामुळे दुरवस्था झाली.

निविदा प्रक्रिया सुरू : जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात होणार कामाला सुरूवातगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून चार प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जात असून या राष्ट्रीय महामार्गांची पावसामुळे दुरवस्था झाली. त्यामुळे २०१६-१७ मध्ये ८६.५ किमी रस्ते दुरूस्त करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली, गडचिरोली-सिरोंचा, मूल-धानोरा हे राज्य महामार्ग होते. मात्र मागील वर्षी केंद्र शासनाने या मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये केला आहे. त्यामुळे या महामार्गांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १३० टक्के पाऊस झाला. संततधार पावसामुळे डांबरी रस्त्यावरील डांबर उखडून गेले. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ते नुतनीकरणाच्या कामाला जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून सुरूवात होते. तोपर्यंत खड्डे बुजवून मार्ग चालवावा लागतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. या अंतर्गतच गडचिरोली शहरातील खड्डे बुजविण्यात आले होते. रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने सदर रस्त्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ८६ किमीच्या रस्त्यांचे नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५०० किमीपेक्षा अधिक आहे. यापैकी केवळ ८६.५ किमीचे नुतनीकरण केले जाणार आहे. म्हणजेच उर्वरित मार्गांची स्थिती आहे तशीच राहणार आहे. चार प्रमुख मार्गांचे ११ भागांमध्ये विभाजन करून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेची कामे सुरू असल्याने किमान ८६.५ किमी लांबीचे रस्ते दुरूस्त होतील, अशी आशा आहे.६८.९३ कोटींचा निधी मंजूरस्थानिक राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने आरमोरी-गडचिरोली दरम्यानचे १० किमी, गडचिरोली-तळोधी दरम्यान १०.५ किमी, आष्टी ते आलापल्ली दरम्यान २२ किमी, तळोधी ते आष्टी दरम्यान १५.५ किमी, आलापल्ली ते सिरोंचा दरम्यान २८.५ किमी रस्तयाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी एकूण ६८.९३ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. दुरूस्तीचे प्रस्ताव कार्यालयाने शासनाकडे सादर केले होते. या प्रस्तावांना मंजुरी प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर निधी सुध्दा उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रीय महामार्गांचे नवीन बांधकाम होईपर्यंत जुन्याच रस्त्यांची डागडुजी करून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग नवीन बांधण्यास पुढील एक ते दोन वर्ष लागणार आहेत.