शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

बीबीए, बीएमएस, बीसीएची नावे बदलणार; एआयसीटीईच्या नियमांना बगल देण्यासाठी पर्यायाची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 10:32 AM

एआयसीटीईचे कठोर निकष लागू नये म्हणून त्यांचे नामकरण करण्याचा पर्याय पुढे आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बीबीए, बीएमएस आणि बीसीए अभ्यासक्रमांच्या नाव बदलाला विद्यापीठाच्या विद्वत सभेत (अकॅडेमिक कौन्सिल) मान्यता घेऊन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) निकषांना बगल देण्याचा विचार सुरू आहे.

एआयसीटीईचे कठोर निकष लागू नये म्हणून त्यांचे नामकरण करण्याचा पर्याय पुढे आला होता. या संदर्भात मुंबईतील महाविद्यालय प्राचार्यांनी नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात विद्यापीठांच्या विद्वत सभेत या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करून घ्यावा, असा विचार पुढे आला. एआयसीटीईचे नियम या अभ्यासक्रमांना लागू केल्यास महाविद्यालयांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. आम्ही याबाबत मुंबई विद्यापीठाला पत्र लिहिले होते. तसेच, राज्य सरकारकडेही आपल्या अडचणी मांडल्या होत्या, अशी माहिती मुंबई महाविद्यालय प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष टी. ए. शिवारे यांनी सांगितले. विद्यापीठात १५५ महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम राबविला जात आहे. गेल्या वर्षी १४ हजार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. 

स्वायत्त महाविद्यालयांच्या धर्तीवर नामबदल स्वायत्त महाविद्यालये नाव बदलून हे अभ्यासक्रम राबवित आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतूनही याच पद्धतीने नाव बदलून हे अभ्यासक्रम राबविले जातील, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 असा होणार नामबदल मूळ अभ्यासक्रम    प्रस्तावित नावबॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस)     बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए)     बीकॉम (बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन)बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए)     बीएस्सी (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)

हे अभ्यासक्रम शहराप्रमाणे राज्याच्या ग्रामीण भागातही लोकप्रिय आहेत. परंतु, त्यांना एआयसीटीई अंतर्गत आल्यास ते लवकरच बंद होतील. कारण अभ्यासक्रम राबविण्यासाठीचा खर्च वाढेल आणि विद्यार्थ्यांना हे शुल्क परवडणार नाही.- टी. ए. शिवारे

टॅग्स :Educationशिक्षण