शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ केजरीवाल

By admin | Updated: July 11, 2016 04:04 IST

सामान्यत: लोकाना आक्रमकता भावत असते, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असोे. अट एकच, त्या आक्रमकतेत विखार नसावा आणि तिला भांडकुदळपणाचे स्वरुप प्राप्त होता कामा नये

सामान्यत: लोकाना आक्रमकता भावत असते, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असोे. अट एकच, त्या आक्रमकतेत विखार नसावा आणि तिला भांडकुदळपणाचे स्वरुप प्राप्त होता कामा नये. अर्थात आक्रमकता आणि भांडखोर वृत्ती यातील सीमारेषा तशी अस्पष्ट असते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तर ती दिसतच नसावी किंवा मान्य नसावी असे दिसते. त्यापायी सकारण वा अकारण सतत भांडणारा राजकारणी अशी त्यांची प्रतिमा होत चालली आहे. दिल्ली शहर प्रथमपासून केन्द्रशासित प्रदेश होता आणि तिथे शहराच्या कारभारासाठी महापालिका होती. १९९३मध्ये घटना दुरुस्तीच्या मार्गे दिल्ली विधानसभा अस्तित्वात आली आणि केजरीवालांपर्यंत एकूण चार मुख्यमंत्री तिथे होऊन गेले. पैकी काँग्रेसच्या शीला दीक्षित तर सलग दहा वर्षे मुख्यमंत्री होत्या. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही या चौघांची आणि विशेषत: श्रीमती दीक्षित यांचीही मागणी होती. पण ती पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी थयथयाट केला असे काही झाले नाही. त्याचबरोबर दिल्लीचे काही अडले असेही नाही. पण केजरीवालांची बातच न्यारी. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचे गाडे या एकाच मागणीवर अडून बसले असून ती पूर्ण होत नसल्याने ते केवळ या एकाच नव्हे तर अनेक बाबतीत नरेन्द्र मोदी यांना खलपुरुष ठरवीत आहेत. त्यांच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला तेव्हांही त्यांनी मोदींच्याच नावे बोटे मोडली होती. आता त्या अधिकाऱ्यास लाच प्रकरणी अटकच झाली आहे. परिणामी मोदी आपल्याला हवे ते देत नाही म्हणून त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. न्यायालयाकडून आपल्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती. केजरीवालांना राज्यघटनेतील संबंधित तरतुदीचे स्पष्टीकरण करुन हवे होते. पण उच्च न्यायालयाने मुळात स्वत:च्याच कार्यकक्षेचा मुद्दा उपस्थित करुन निकाल राखून ठेवला. त्यावर केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. पण आता या वरिष्ठ न्यायालयाने त्यांनाच धरुन चांगले फटकारले आहे. उच्च न्यायालयाचा निवाडा येऊ द्या मग पाहू असे त्याने म्हटले. मुळात आपल्या तथाकथित अधिकारांसाठी केजरीवाल इतके कासावीस का होत आहेत आणि उच्च न्यायालयाला डावलून ते आमच्याकडे का आले आहेत याबद्दल सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. या झगड्याचे मूळ आहे ते मुळात जमीन विषयक धोरणात्मक निर्णय, पोलीस यंत्रणेवर नियंत्रण, दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था स्थिती आणि बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या. हे चारही अधिकार केजरीवाल यांना हवे आहेत आणि केन्द्र सरकार ते सोडण्यास तयार नाही. पण केवळ मोदी सरकारच ते सोडीत नाही असे नाही तर संपुआच्या राजवटीत त्या सरकारनेदेखील ते सोडले नव्हते. शीला दीक्षित तर काँग्रेसच्याच होत्या पण त्यांच्या आधी भाजपाचे जे तीन मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनीदेखील केजरीवाल करतात तशा थयथयाट केला नव्हता. एकटे केजरीवाल जे अस्वस्थ आहेत त्यामागे म्हणूनच आक्रमकतेपेक्षा खोडसाळपणा अधिक असल्याचे दिसून येते.