शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

लेख: बदल्यांचा महिना अन् ‘फिल्डिंग’चा महिमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:03 IST

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आपल्याकडे कायदा आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी संघर्ष करून हा कायदा त्यावेळी करायला लावला होता. त्याचा अनेकदा खेळखंडोबा झाला हा भाग वेगळा. सोयीनुसार हा कायदा अनेकदा वाकवला, झुकवला अन् तुडवलादेखील गेला. पुन्हा एकदा तसे करण्याची वेळ आली आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आपल्याकडे कायदा आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी संघर्ष करून हा कायदा त्यावेळी करायला लावला होता. त्याचा अनेकदा खेळखंडोबा झाला हा भाग वेगळा. सोयीनुसार हा कायदा अनेकदा वाकवला, झुकवला अन् तुडवलादेखील गेला. पुन्हा एकदा तसे करण्याची वेळ आली आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार दरवर्षी ३१ मेअखेर बदल्या कराव्या लागतात. त्यामुळे आतापासूनच अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. 

बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही आणि तसे केलेच तर संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांवर नियमभंगाची कारवाई केली जाईल, असा आदेश प्रत्येकच विभाग अधूनमधून काढत असतो; पण त्याला काहीही अर्थ नाही. सर्वाधिक बदल्या या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच होतात. बदलीचा कायदा आम्ही आणला, पण बदल्या पारदर्शक पद्धतीनेच करण्यात अद्याप कोणत्याही सरकारला यश आलेले नाही. 

यावर्षीच्या बदल्यांसाठी दलाल सक्रिय झाले आहेत. ते मंत्रालयाच्या आजूबाजूला असलेल्या हॉटेलांमध्ये ग्राहकांना बोलावून तोडपाणी करत असतात. तेथे सरकारने गुप्तचर यंत्रणा लावली तर काही रॅकेटही उघडकीस येतील. महसूल विभागातील बदल्यांमध्ये अर्थपूर्ण व्यवहारांची चर्चा नेहमीच होत आली आहे. नैतिकतेच्या व्याख्या सतत बदलत असतात. सकाळी चुकीचे वाटणारे काम संध्याकाळी व्यवहारात रूपांतरित होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बदल्यांची पारदर्शक पद्धत जाहीर करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. खात्यात एकामागून एक निर्णयांचा सपाटा लावलेल्या बावनकुळेंनी बदल्यांबाबतही तसाच धडाकेबाज निर्णय घेतला तर त्यांची प्रतिमा निश्चितच उंचावेल. मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत, पण मूळ महसूल विभागातील असलेल्या एका अधिकाऱ्याने मध्यंतरी तहसीलदारांच्या पदोन्नतीत घोटाळे होत असल्याच्या बातम्या मुद्दाम पसरविल्या, त्याचा बावनकुळे यांना फार मनस्ताप झाला, अशी माहिती आहे.

महसूल खालोखाल नगरविकास आणि गृह खात्यात बदल्यांसाठी जोरदार हालचाली होत असतात. शिवाय, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय ही खातीदेखील बदल्यांबाबत चर्चेत असतात. या सरकारचे वेगळेपण म्हणून हंगाम सुरू होत असताना बदल्यांबाबतचे पारदर्शक असे काही निर्णय सरकारने घेतले तर एक वेगळा मेसेज लोकांमध्ये नक्कीच जाईल.

बदल्यांचे अर्थकारण काहीशे कोटी रुपयांचे असावे; पण त्यातून खात्याची बदनामी मोठ्या प्रमाणात होते. अनेक बाबतीत अनेक विभागात प्रामाणिकपणे काम होतही असेल; पण बदल्यांमध्ये गडबडी झाल्या तर बदनामी कोणतेही चांगले काम रोखू शकत नाही. प्रतिनियुक्तीवर वर्षानुवर्षे मंत्रालय आणि अन्य महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांमध्ये ठाण मांडून बसलेल्यांचे मात्र कोणी काही बिघडवू शकत नाही. मूळ पशुसंवर्धन खात्यातील असलेले अनेक अधिकारी वर्षानुवर्षे मंत्रालयातून हलता हलत नाहीत.

निवडणुकीचे वेगळेपण

बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांसाठी सुप्रिया सुळेंनी मते मागितली, शरद पवार यांनी सूनबाईंना मतदान करण्याचे आवाहन केले. दोन राष्ट्रवादी जणू एकच असल्याचे वाटत होते. हाच धागा लगेच पुढे जाऊन दोन पक्ष तत्काळ एकत्र येतील असे मात्र वाटत नाही; पण या निमित्ताने पवार कुटुंब एक दिसले. सत्तापक्ष विरुद्ध विरोधी पक्ष असा सामनाच नव्हता. सत्तापक्षाच्या सुनेत्रा पवार यांना सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. खालच्या पातळीवर जावून प्रचार झाला नाही. मतदारांना पैसे वाटप वगैरे गैरप्रकारही घडले नाहीत. हे असे सर्व निवडणुकांत झाले तर? म्हणजे, उमेदवार एकमेकांच्या विरोधात असतीलच, पण शिवराळ भाषेचा वापर नाही, एकमेकांवर घाणेरडे आरोप नाहीत, अर्थात हा कल्पनाविलास आहे. प्रचाराबाबत अशी आदर्श निवडणूक व्हायची तर एखाद्या बड्या नेत्याचे अपघाती निधन व्हावे लागते. एरवी राजकारणात भावनांना जागा कुठे असते? त्यामुळे इतर निवडणुकांत असले शहाणपण कोणत्याही राजकीय पक्षाला येण्याची शक्यता नाहीच.

पवारांचे न झालेले मतदान

ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुंबईत इस्पितळात भरती असल्याने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाला जाऊ शकले नाहीत. प्रकृतीच्या कारणाने मतदानाला जाऊ शकत नाही, अशी खंत त्यांनी एक्सवर व्यक्त करतानाच सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहनदेखील केले. पवार मुंबईत असूनही मतदान करू शकले असते का? त्याचे उत्तर नाही असे आहे. ८५ वर्षांवरील व्यक्तीला घरून मतदान करता येईल, असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या निवडणुकीपासूनच घेतला आहे. पवार ८५ वर्षांहून अधिक वयाचे आहेत; पण नियम असाही आहे की ज्या मतदारसंघात तुम्ही मतदान करणार आहात, त्याच मतदारसंघात तुम्ही घरीच असायला हवे, तरच मतदान यंत्रणा तुमच्या घरी येऊन तुमचे मतदान करवून घेईल. तुम्ही मतदारसंघातच आहात; पण मतदारयादीतील तुमच्या पत्त्यावर नाही, तर तुमचे मतदान घेता येणार नाही. 

याचा अर्थ पवार हे बारामतीतील इस्पितळात भरती असते तरी त्यांना मतदान करता आले नसते.  आणखी एक नियम असा आहे की घरून मतदान करायचे तर निवडणुकीची अधिसूचना निघाल्यापासून पाच दिवसांच्या आतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तसे कळवावे लागते. हे सगळे इथे मांडण्याचे कारण असे की शरद पवार इस्पितळात भरती असले तरी मतदान करू शकतील का, अशी विचारणा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे एका विशिष्ट कार्यालयातून करण्यात आली होती, अशी कुजबुज सुरू आहे. आता त्यामागचा उद्देश काय होता हे ज्याने त्याने समजावे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Transfers: Lobbying Intensifies Amidst Allegations of Corruption and Political Influence

Web Summary : Maharashtra's annual transfer season sees increased lobbying and corruption allegations. Political interference persists despite regulations. Revenue, urban development, and home departments are hotspots. Baramati by-election saw Pawar family unity, but ideal elections remain a distant dream. Pawar couldn't vote due to location rules.
टॅग्स :Mantralayaमंत्रालयMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र