शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

कुशल नेतृत्वाचा अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 04:26 IST

सर्वसामान्य नागरिक असो, कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता, प्रत्येकालाच सुषमा या आपली बहीण किंवा घरातील सदस्य आहेत, असे वाटायचे.

- विनय सहस्रबुद्धे, भाजपचे उपाध्यक्षसुषमा स्वराज या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या नेत्या होत्या. सुरुवातीच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुढे राजकारणासोबतच त्यानंतरच्या काळात प्रशासनातही त्यांनी कुशल नेतृत्वगुणाचा ठसा उमटवला. त्या भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्त्या, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि देशाच्या पहिल्या पूर्णकालीन परराष्ट्रमंत्री होत्या. त्यांच्या कार्यशैलीत संघटनात्मक गुण आणि प्रशासकीय कौशल्य सुस्पष्ट होते. सर्वसामान्य नागरिक असो, कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता, प्रत्येकालाच त्या आपली बहीण किंवा घरातील सदस्य आहेत, असे वाटायचे. त्यांच्या स्वभावातील याच आपलेपणामुळे राजकीय पक्षांच्या सीमा त्यांनी सहज पार केल्या.

परराष्ट्र मंत्रालयाला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत भारताचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी यशस्वी ठरलेल्या परराष्ट्रमंत्र्यांच्या यादीत त्यांचेही नाव आदराने घेतले जाईल. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला लोकाभिमुख केले. देशाबाहेर आलेल्या आपत्तीचा सामना करून तेथे अडकलेल्या लोकांना सुखरूप सोडवणे, मदत व बचावकार्य उपलब्ध करून देणे यासाठी त्या सदैव तत्पर असायच्या. त्या म्हणायच्या, ‘बचाव कार्य हे फक्त एक ट्विट करण्याइतपच बाकी आहे.’ मदत-बचाव कार्यात त्यांनी मिळवलेल्या याच यशामुळे अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, येमन आणि अन्य देशांत अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी आग्रह होऊ लागला. सुषमाजींच्या मनात सर्वांप्रति असलेले प्रेम, चातुर्य, कौशल्य आणि राजनैतिक दृष्टिकोन यामुळेच हे शक्य होऊ शकले. जे अमेरिकेला शक्य झाले नाही, तेदेखील त्यांनी करून दाखवले.
भारताला लाभलेली सांस्कृतिक संपदा हे अनमोल देणे. त्याच्या विकासासाठी त्यांनी ‘आयसीसीआर’ला (भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद) विकसित करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. नेपाळमध्ये भारतविरोधी सूर आळवला जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या वेळी अशा विद्यार्थ्यांची माहिती मागवली, ज्यांना आयसीसीआरच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात आली असेल. आयसीसीआरद्वारे दरवर्षी हजारो परदेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, त्या वेळी अशा प्रकारे शिष्यवृत्ती देण्यात आलेल्यांची नोंद ठेवण्याची व्यवस्था नव्हती. ही अतिशय साधी, परंतु महत्त्वपूर्ण बाब होती. त्यामुळेच सर्वांत आधी त्यांनीच यासाठी ‘अ‍ॅडमिशन टू अ‍ॅल्यूमिनाय’ डेटाबेसची व्यवस्था तयार केली.
सुषामाजींनी दूतावासाला लोकाभिमुख केले. यामुळे पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य कामांसाठी दूतावासांकडे जबाबदारीचे भान आले. अटलजींच्या कार्यकाळात माहिती आणि प्रसारणमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी चोखपणे बजावली. त्यांनी चित्रपटनिर्मितीला व्यवसायाचा दर्जा दिला. चित्रपटांची निर्मिती करणे सोपे झाले. याचप्रमाणे ज्या कोणत्या क्षेत्रात त्यांनी काम केले तेथे आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला. मी त्यांना प्रतिष्ठित राजकारणाची प्रतिनिधी मानतो. राजनैतिक स्पर्धा असूनही कौतुकास्पद काम करून सर्वांसोबत सलोख्याचे संबंध, उत्तम संपर्क प्रस्थापित करण्याच्या कामात त्या कायम अग्रस्थानी राहिल्या.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज