शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
3
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
4
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
5
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
6
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
7
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
8
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
9
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
10
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
11
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
12
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
13
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
14
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
15
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
16
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
17
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
18
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
19
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
20
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
Daily Top 2Weekly Top 5

हेच ते ‘सॅबोच्युअर्स’?

By admin | Updated: December 17, 2015 02:52 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांची भेट घेऊन आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांची भेट घेऊन आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत हिन्दीतून निवेदन करताना ‘सॅबोच्युअर’ याच शब्दाचा वापर केला. बहुधा हिन्दी भाषेत त्यांना या कुविशेषणाचा प्रतिशब्द सापडला नसावा. अर्थात मराठीतही तसा तंतोतंत शब्द नाही. पौराणिक काळात ऋषीमुनींच्या यज्ञात हाडके टाकण्याचा उद्योग काही राक्षस करीत असत असे सांगतात. हे राक्षस म्हणजेच सॅबोच्युअर्स असे म्हणता येईल. तूर्तास त्यांना घातपाती लोक असे म्हणता येईल. सुषमा स्वराज यांनी अशा घातपात्यांकडे स्पष्ट निर्देश केला नसला तरी इशारा बहुधा हुरियतच्या नेत्यांकडे असावा. कारण स्वराज पाकिस्तानातून परतत नाहीत तोच या नेत्यांनी पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बासीत यांची भेट घेतली (त्यांनीही ती दिली) व भारत-पाक दरम्यान होणाऱ्या चर्चेच्या वेळी पाकिस्तानने कोणती भूमिका घ्यावी याचे मार्गदर्शनही केले. काश्मीर हा विवाद्य मुद्दा असल्याचे आणि काश्मिरातून तत्काळ सैन्य मागे घेण्याचे भारत मान्य करीत नाही तोवर चर्चा होऊ शकत नाही ही भूमिका पाकिस्तानने घ्यावी असे जहालपंथी आणि पाकधार्जिणे हुरियत नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी बासीत यांना सांगितले. त्यांच्या या भेटीवर काँग्रेस पक्षाने सडकून टीकादेखील केली आहे. अर्थात गिलानी आणि बासीत यांच्यातील चर्चेला एक वेगळी पार्श्वभूमीदेखील आहे. भारताचे पाकमधील राजदूत टी.सी.ए.राघवन यांनी याच सप्ताहात पाकिस्तानमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना, उभय देशांदरम्यानच्या चर्चेत काश्मिरचा मुद्दा नक्की असेल आणि असलाच पाहिजे पण काश्मीर कोणते तर आज पाकिस्तानने ज्याला वेढून ठेवले आहे, ते! त्यांच्या या स्पष्ट विधानामुळे हुरियत नेते पिसाळले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान चीनच्या दौऱ्यावर असलेल्या नवाज शरीफ यांनी अलीकडच्या काळात ते स्वत: आणि मोदी व स्वराज यांच्या दरम्यान जी चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक असल्याचे चिनी नेत्यांना आवर्जून सांगितले. पण एकीकडे असे प्रमाणपत्र द्यायचे आणि दुसरीकडे हुरियतच्या नेत्यांना गोंजारत राहायचे हा पाकिस्तानचा नेहमीचाच उद्योग राहिला आहे. तशातच भारताने मात्र प्रथमपासून आपली भूमिका स्वच्छ ठेवली आहे आणि ती म्हणजे चर्चा केवळ द्विपक्षीयच राहील तिच्यात तिसऱ्या पक्षाला म्हणजे हुरियतला कोणतेही स्थान राहणार नाही. हे सारे पाहिल्यानंतर सुषमा स्वराज यांना आलेला अनुभव व त्याआधारे त्यांनी व्यक्त केलेला आशावाद गाळूनच घेतलेला बरा.