शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

धुलिकण नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:29 IST

कुण्या एकेकाळी ही नागपूर नगरी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ हवेचे ठिकाण म्हणून ओळखली जात असे. हिरवाईचा मानही तिला प्राप्त झाला होता. पण काळवेळ बदलत गेली आणि तिची ही ओळखही हवेतील प्रचंड वाढलेल्या धुलिकणात विरत गेली. आज जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असल्याचे दूषण या शहराला लागले आहे.

पूर्वी कुठल्याही कथेची सुरुवात ‘एक आटपाट नगर होते..’ अशी बहुदा होत असे. आज राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा उल्लेखही असाच काहीसा करावा लागतोय. कुण्या एकेकाळी ही नागपूर नगरी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ हवेचे ठिकाण म्हणून ओळखली जात असे. हिरवाईचा मानही तिला प्राप्त झाला होता. पण काळवेळ बदलत गेली आणि तिची ही ओळखही हवेतील प्रचंड वाढलेल्या धुलिकणात विरत गेली. आज जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असल्याचे दूषण या शहराला लागले आहे. येथील धुलिकणांनी मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर, देशातील सतरावे तर जगात ६२ व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर अशी ख्याती या नगरीला प्राप्त झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात हे ‘प्रदूषित’ वास्तव समोर आले. विदर्भातील चंद्रपूरचेही नाव त्यात आहे. १०८ देशांमधील चार हजार लोकवस्तींचा अभ्यास केल्यावर त्यातील ८५९ शहरांची प्रदूषणाची पातळी तपासण्यात आली होती. या देशात जवळपास ३४ लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषणामुळे झाल्याचे या अहवालात नमूद आहे. प्रदूषित शहरांमध्ये आघाडी ही काही भूषणावह नाही. ‘रस्ते तुम्हाला आॅक्सिजन देणार आहेत काय?’असा सवाल मागे राष्टÑीय हरित लवादाने एका प्रकरणात उपस्थित केला होता. झाडांच्या वाढत्या कत्तलींची पार्श्वभूमी त्याला होती. पण थोड्या वेगळ्या कारणाने नागपूरसंदर्भातही सध्या हाच प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. येथील रस्त्यावर वाढलेली वाहनांची अवाढव्य संख्या, त्यात रस्ते आणि मेट्रोचे मोठ्या प्रमाणात सुरु असलेले बांधकाम यामुळे हवेतील धुलिकण प्रचंड वाढले आहेत. आणि हे धुलिकण म्हणजे वायू प्रदूषणातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहेत. वातावरणातील या प्रदूषणामुळे लोकांना मोकळा श्वास घेणेसुद्धा दुरापस्त झाले आहे. मनुष्याला प्राणवायू देणारी हवाच मृत्युदायी बनल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. विकासकामांचा सपाटा लावला असताना प्रदूषण नियंत्रणासाठी मात्र अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत. किंबहुना शहरांकडे आवश्यक उत्पन्न व साधनसामग्री नाही. कारण आपण अजूनही स्वयंसिद्ध नाही आणि निधी असलाही तरी शहर सौंदर्यीकरण आणि प्रदूषणमुक्तीला त्यात प्राधान्य नाही,असेच म्हणावे लागेल. म्हणायला प्रदूषण नियंत्रण मंडळे आहेत पण ती किती उपयुक्त ठरताहेत,हे कोडेच आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारे हे प्रदूषण बघता निकट भविष्यात नागपूरकरांवर आॅक्सिजन सिलिंडरसोबत घेऊन वावरण्याची वेळ आल्यास त्यात आश्चर्य काहीच नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य