शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

धुलिकण नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:29 IST

कुण्या एकेकाळी ही नागपूर नगरी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ हवेचे ठिकाण म्हणून ओळखली जात असे. हिरवाईचा मानही तिला प्राप्त झाला होता. पण काळवेळ बदलत गेली आणि तिची ही ओळखही हवेतील प्रचंड वाढलेल्या धुलिकणात विरत गेली. आज जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असल्याचे दूषण या शहराला लागले आहे.

पूर्वी कुठल्याही कथेची सुरुवात ‘एक आटपाट नगर होते..’ अशी बहुदा होत असे. आज राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा उल्लेखही असाच काहीसा करावा लागतोय. कुण्या एकेकाळी ही नागपूर नगरी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ हवेचे ठिकाण म्हणून ओळखली जात असे. हिरवाईचा मानही तिला प्राप्त झाला होता. पण काळवेळ बदलत गेली आणि तिची ही ओळखही हवेतील प्रचंड वाढलेल्या धुलिकणात विरत गेली. आज जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असल्याचे दूषण या शहराला लागले आहे. येथील धुलिकणांनी मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर, देशातील सतरावे तर जगात ६२ व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर अशी ख्याती या नगरीला प्राप्त झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात हे ‘प्रदूषित’ वास्तव समोर आले. विदर्भातील चंद्रपूरचेही नाव त्यात आहे. १०८ देशांमधील चार हजार लोकवस्तींचा अभ्यास केल्यावर त्यातील ८५९ शहरांची प्रदूषणाची पातळी तपासण्यात आली होती. या देशात जवळपास ३४ लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषणामुळे झाल्याचे या अहवालात नमूद आहे. प्रदूषित शहरांमध्ये आघाडी ही काही भूषणावह नाही. ‘रस्ते तुम्हाला आॅक्सिजन देणार आहेत काय?’असा सवाल मागे राष्टÑीय हरित लवादाने एका प्रकरणात उपस्थित केला होता. झाडांच्या वाढत्या कत्तलींची पार्श्वभूमी त्याला होती. पण थोड्या वेगळ्या कारणाने नागपूरसंदर्भातही सध्या हाच प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. येथील रस्त्यावर वाढलेली वाहनांची अवाढव्य संख्या, त्यात रस्ते आणि मेट्रोचे मोठ्या प्रमाणात सुरु असलेले बांधकाम यामुळे हवेतील धुलिकण प्रचंड वाढले आहेत. आणि हे धुलिकण म्हणजे वायू प्रदूषणातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहेत. वातावरणातील या प्रदूषणामुळे लोकांना मोकळा श्वास घेणेसुद्धा दुरापस्त झाले आहे. मनुष्याला प्राणवायू देणारी हवाच मृत्युदायी बनल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. विकासकामांचा सपाटा लावला असताना प्रदूषण नियंत्रणासाठी मात्र अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत. किंबहुना शहरांकडे आवश्यक उत्पन्न व साधनसामग्री नाही. कारण आपण अजूनही स्वयंसिद्ध नाही आणि निधी असलाही तरी शहर सौंदर्यीकरण आणि प्रदूषणमुक्तीला त्यात प्राधान्य नाही,असेच म्हणावे लागेल. म्हणायला प्रदूषण नियंत्रण मंडळे आहेत पण ती किती उपयुक्त ठरताहेत,हे कोडेच आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारे हे प्रदूषण बघता निकट भविष्यात नागपूरकरांवर आॅक्सिजन सिलिंडरसोबत घेऊन वावरण्याची वेळ आल्यास त्यात आश्चर्य काहीच नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य