शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

संधिसाधूंचा सुकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 01:05 IST

कोरोनारूपी संकटाने जग भयग्रस्त झाले असताना, अनेक जण संकटात सापडले असताना, मदतीचे अनेक हात पुढे आलेले दिसतात.

माणसाने परोपकाराचा कितीही आव आणला तरी त्याची मूळप्रवृत्ती वेळेवर उफाळून वर येतेच. षड्रिंपूसोबत ही प्रवृत्ती पिंगा घालत असतेच. सद्वर्तनाचा प्रयत्न करून माणूस या सर्वांवर मात करण्याचा प्रयत्न करतो; पण बहुतेक वेळा पराभवच त्याच्या पदरी पडतो. ‘संकटसमयी कोण कामास येतो’ हे वचन वारंवार वास्तवाची जाणीवही करून देत असते; पण जरा काही बरे दिवस आले की, आपल्याला वास्तवाचा विसर पडतो.

कोरोनारूपी संकटाने जग भयग्रस्त झाले असताना, अनेक जण संकटात सापडले असताना, मदतीचे अनेक हात पुढे आलेले दिसतात. त्याचवेळी परिस्थितीची असहायता पाहून हात साफ करणारेही कमी नसतात. कोणत्याही वस्तूची टंचाई नसताना आज बाजारात अन्नधान्य, भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांवर भाजीपाला, फळे फेकून देण्याची पाळी आली. कारण वाहतूक ठप्प आहे. शहरात भाजीपाला आणला तरी व्यापारी भाव पाडून खरेदी करतात, म्हणजे एक तर भाजीपाला, फळे नाशवंत असल्याने हाती पडेल ते घ्यावे लागते.

‘अडला हरी’ यापेक्षा वेगळे काही करू शकत नाही. दुसरीकडे सुगी संपत आल्याने गहू, ज्वारीसारख्या धान्याचे साठे भरपूर आहेत. डाळी मुबलक आहेत; पण किरकोळ विक्रीत यांचीही भाववाढ झाली. सरकारही अशा नफेखोरांवर नजर ठेवून आहे; परंतु सरकारसमोर आजच्या घडीला हा प्राधान्याचा विषय होऊ शकत नाही. अशी संधी साधत नफेखोर उखळ पांढरे करीत आहेत. मागणी आणि पुरवठा यापैकी कोणत्याही घटकात तफावत नसताना अशी भाववाढ अनैसर्गिक असते आणि ती केवळ नफेखोरांनीच केलेली असते, अशीच परिस्थिती दुधाचीही आहे.

दुधाचे उत्पादन नाशवंत असल्याने अनेक शेतकऱ्यांना ते फेकून द्यावे लागते किंवा कवडीमोल दराने तरी विकावे लागते; पण शहरांमध्ये दूध महागले आहे. या साखळीमध्ये सर्वात जास्त नागवला जातो तो शेतकरी. कारण या उत्पादनामध्ये खरी गुंतवणूक त्याची असते. तो जसा पैसा गुंतवतो तसाच तो श्रमही खर्ची घालतो; पण त्याची झोळी फाटकीच राहते. यावर्षी तर पावसाने झोडपल्याने त्याचे खरीप गेले. कोरोनाचा पहिला फटका त्याला बसला. कोरोनामुळे चीनवर संकट आले त्यावेळी कापसाचे भाव गडगडले. हा काळ नेमका कापूस विक्रीला काढण्याचा होता. अतिवृष्टीमुळे मक्याचे उत्पादन घटले आणि आयातही ठप्प झाल्याने मक्याचे भाव कधी नव्हे ते दोन हजारांवर पोहोचले होते; पण कोरोनाने पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे मोडल्याने मक्याची पार घसरगुंडी झाली. ती सहा-सातशे रुपयांपर्यंत म्हणजे येथेही नुकसान झाले.

आताही रबीची सुगी झाली आणि घाऊक बाजारातील भाव नैसर्गिकपणे उतरले. शिवाय कोरोनाच्या प्रकोपाचाही परिणाम झाला. बाजारपेठा बंद असल्याने स्थानिक पातळीवरच आतबट्ट्याचे व्यवहार करावे लागले. शेवटी नुकसान शेतकºयाचेच झाले आहे. अन्नधान्याचे भाव स्थिर ठेवणे तसेच नफेखोरीला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा असली तरी ती सध्या वेगळ्या आघाडीवर व्यस्त आहे. संकटात जशा आशादायक बातम्या लढण्याची ऊर्मी वाढवतात, तशा अशा संधिसाधूंच्या कृत्यामुळे एक निराशेचे मळभही येते. तरी लढताना धीर सोडता येत नाही आणि आता तर अदृश्य शत्रूशी अस्तित्वाची लढाई आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर असला तरी प्रामुख्याने युरोप, अमेरिकेत ही प्रवृत्ती दिसत नाही किंवा तशा बातम्याही नाहीत. त्याचवेळी नागरिकही तितक्याच जबाबदारीने वागताना दिसतात. बाजारात अनावश्यक मागणी झाली, तर नफेखोरांसाठी ती संधी असते. देशात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, फळे, इंधन, अशी कोणत्याही वस्तूंची टंचाई नाही. सरकारही वारंवार याचा दिलासा देताना दिसते; पण लोकच अनावश्यक खरेदी करून अशा वस्तूंचे साठे करीत आहेत. कारण बाजार बंद राहील ही भीती वाटते. या अकारण काळजीपोटी ही वारेमाप आणि बेभाव खरेदी चालू आहे. कारण कोरोनाच्या भीतीने सारासार विचार करणे समाजाने सोडून दिलेले दिसते.

महाराष्ट्रात तर वर्षभर पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा आहे, तरी जनतेच्या मनात संभ्रम का निर्माण होतो, असा प्रश्न पडतोच. भीतीमुळे सारासार विवेक शिल्लक राहत नाही. अशावेळी उमेद वाढवणाºया गोष्टी असताना मानवी प्रवृत्तीचे दर्शनही प्रकर्षाने होते. शेवटी लोभ, हाव, स्वार्थ याला काहीही म्हणता येते. शेवटी ती मूळप्रवृत्ती आहे आणि आपल्या गूणसूत्रांसह आलेली, म्हणूनच संधिसाधंूसाठी सुकाळ म्हणावा आणि आपला संघर्ष चालू ठेवावा.

देशात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, फळे, इंधन, अशी कोणत्याही वस्तूंची टंचाई नाही. सरकारही वारंवार याचा दिलासा देताना दिसते; पण लोकच अनावश्यक खरेदी करून अशा वस्तूंचे साठे करीत आहेत. कारण बाजार बंद राहील ही भीती वाटते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत