शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

आता पुरुष आरक्षण

By admin | Updated: May 18, 2015 00:36 IST

केन्द्रातील भाजपा सरकारच्या प्रत्येक योजनेला विरोध करणे हा आपला निसर्गदत्त अधिकार असल्याचे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार आणि

केन्द्रातील भाजपा सरकारच्या प्रत्येक योजनेला विरोध करणे हा आपला निसर्गदत्त अधिकार असल्याचे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार आणि या सरकारचे प्रमुख सिद्धरामय्या मानीत असतील तर तो त्या दोहोतला प्रश्न आहे, असे मानून सोडून देता येईल. कदाचित त्यामुळेच मोदी सरकारने प्रत्येक खासदाराने त्याच्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करावा, अशी जी योजना अंमलात आणली, ती राबविण्यास कर्नाटक सरकारने चक्क नकार दिला असूनही केन्द्राने कोणताही वाद अजून तरी निर्माण केलेला नाही. परंतु पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठीचे पन्नास टक्क्यांचे आरक्षण लागू करण्याची कल्पना वा योजना भाजपा किंवा रालोआची नाही. ती सुरू केली गेली काँग्रेसच्याच राजवटीत. उलट हे आरक्षण वाढवावे असा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आग्रह आहे. परंतु तितकेच नव्हे, तर आरक्षणाचा लाभ घेऊन निवडून आलेल्या महिलांची मुदत पाचऐवजी दहा वर्षांची केली जावी अशी जी सूचना काही राज्यांनी अलीकडेच केली, तिचा विद्यमान रालोआ सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. असे असताना सिद्धरामय्या सरकारने त्या राज्यातील पंचायतींमधील महिला आरक्षणाला छेद देण्याचा अजब निर्णय घेतला आहे. तो घेताना त्यांनी एकीकडे महिलांसाठी असलेले पन्नास टक्क्यांचे आरक्षण आता पुरुषांनाही बहाल करण्याचा निर्णय घेतला असून, तशी दुरुस्ती कर्नाटक पंचायत राज कायद्यात केली गेली आहे व तसे आदेशदेखील जारी केले आहेत. चालू महिन्याच्या एकोणतीस तारखेला होणाऱ्या निवडणुकांसाठी ही नवी रचना लागू होईल. कायद्यात बदल करण्याचे समर्थन करताना त्या राज्याचे पंचायत राज मंत्री के. एच. पाटील यांनी म्हटले आहे की, पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाऊन तब्बल पंचाऐंशी टक्के महिला निवडून जाण्यापर्यंत मजल गाठली गेल्याने बिचाऱ्या पुरुषांवर ‘अन्याय’ होऊ लागला आहे ! परिणामी संबंधित कायद्यातील ‘किमान पन्नास टक्के महिला’ या विधानाच्या ऐवजी ‘कमाल पन्नास टक्के महिला’ अशी शब्दयोजना केली गेली आहे. जे मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत, तेथून केवळ महिलाच निवडणूक लढवू इच्छितात; पण सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर त्यांना बंदी नसते. आता ती कर्नाटकात लागू केली जाईल. पण त्यात महिलांच्या सक्षमीकरणाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाणार आहे. महिला सक्षम व्हाव्यात आणि जोवर त्यांच्यासाठी आरक्षण दिले जात नाही, तोवर ते होणार नाही, हे ओळखूनच केन्द्राच्या सूचनेवरून सर्व राज्यांनी संबंधित कायदे केले. ते करतानाच, महिलांचा टक्का वाढला तर ते स्वागतार्ह असेल ही भूमिका अनुस्यूत होती. कर्नाटकात तसे झालेले दिसते. त्यामुळे खरे तर त्या राज्याचा खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणून गौरवच झाला पाहिजे. पण हाच गौरव सिद्धरामय्या यांना मात्र नकोसा झालेला दिसतो.