शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

गोव्याची राजधानी पाच दिवस पाण्याविना तडफडते तेव्हा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 08:10 IST

राजधानी पणजी ज्या तालुक्यात येते तो तिसवाडी व फोंडा तालुका गेले पाच दिवस पाण्याविना तडफडत होता आणि सरकार केवळ तोंडाची वाफ दवडत होते.

- राजू नायक 

पणजी - राजधानी पणजीत गेले दोन दिवस अक्षरश: सरकारविरोधात असंतोष धुमसत असून त्यापूर्वी तीन दिवस पाण्याविना होणारे हाल लोकांनी मुकाट्याने सहन केले होते. परंतु चौथा दिवस उलटूनही पुरवठा सुरळीत झाला नाही तेव्हा लोक संतापले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लोकांनी केली. 

ओपा जलाशयातून पाणीपुरवठा करणारी वाहिनी खांडेपार येथे फुटली. तेथील राष्ट्रीय हमरस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणातून हा प्रकार घडला. एका महिन्यात तीन वेळा ही दुर्घटना घडली आहे. परंतु जे काम ४८ तासांत सहज होऊ शकले असते, त्याला पाच दिवस लागणे, याबद्दल लोकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत अननुभवी असल्याने व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनाही या कामाचा अनुभव नसल्याने हा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. प्रसारमाध्यमांनी एकमुखाने सरकारच्या या अनास्थेचा निषेध केला. 

दोन तालुक्यांतील लोकांचे या काळात अतोनात हाल झाले. लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले व टँकरवाल्यांनी त्यांना लुबाडले. गोव्याला मुख्यत: दोन धरणांमधून पाणीपुरवठा होतो व ती ४०ते ५० कि.मी. दूर आहेत. लोकांनी व सरकारने पारंपरिक जलस्रोतांकडे- तलाव व विहिरींकडे दुर्लक्ष केले व ते पूर्णत: प्रदूषित झाले आहेत. गोव्यात प्रतिवर्षी ११६ इंच पाऊस पडत असता पाणीपुरवठा योजना कार्यक्षम का केली जात नाही, असा सवाल उपस्थित होत असून या योजनांचे विकेंद्रीकरण केले जावे, अशी मागणी झाली. 

सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडेही असे तातडीने काम करण्यासाठी लागणारे तंत्रकौशल्य उपलब्ध नाही. शिवाय या खात्यात अनास्था आणि बेफिकिरीही झिरपली आहे. या प्रकरणात माजी बांधकाम मंत्री- ज्यांनी २० वर्षापेक्षा अधिक काळ हे खाते सांभाळले- सुदिन ढवळीकरांवर तर मंत्रिमंडळातील सदस्यांनीही दोषारोप केले.

रस्त्याचे काम करताना दरडी कोसळून जलवाहिनीला धोका उत्पन्न झाला असेल तर बांधकाम खात्याच्या लक्षात ते कसे आले नाही, असाही सवाल उत्पन्न झाला आहे. ज्या कंत्राटदाराने रस्त्याचे काम केले, तो बांधकाम खात्याला जुमानत नाही व त्याचे वरिष्ठ नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप झाला. 

तज्ज्ञांचे म्हणणे होते की अशा प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी लष्कराच्या अभियांत्रिकी- गॅरीसन इंजिनीअर्स- विभागाची मदत घेण्याचा पर्याय असता राज्य सरकारला त्याचा विसर पडला व साऱ्यांच्याच टीकेचा विषय ठरलेल्या बांधकाम खात्याकडे हे महत्त्वाचे काम सोपविण्यात आले. जोरदार पावसामुळे हे प्रकरण खोळंबले असल्याचा बांधकाम खात्याचा दावाही न पटणारा आहे. पावसाळ्यातही कल्पकता वापरून हे काम करता येऊ शकले असते. पाच दिवसांतही ते पूर्ण करता न येणो हे सरकारच्या अपयशाचे द्योतक असल्याचा सूर ऐकू आला. 

या प्रकरणाचा निष्कर्ष असा की गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे राजकीयीकरण झाले आहे. त्यामुळेही ते भ्रष्ट आहे, निष्क्रिय आहे आणि नेते व अधिकारी यांचे साटेलोटे निर्माण झाले आहेत. त्यामुळे कोणीही त्यात सुधारणा घडवून आणण्यास धजत नाही. परिणामी लोकांच्या वाटय़ाला नेहमी अडचणी येत असतात व पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहणे ही त्याची केवळ एक झलक आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीPramod Sawantप्रमोद सावंतwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात