शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

गोव्याची राजधानी पाच दिवस पाण्याविना तडफडते तेव्हा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 08:10 IST

राजधानी पणजी ज्या तालुक्यात येते तो तिसवाडी व फोंडा तालुका गेले पाच दिवस पाण्याविना तडफडत होता आणि सरकार केवळ तोंडाची वाफ दवडत होते.

- राजू नायक 

पणजी - राजधानी पणजीत गेले दोन दिवस अक्षरश: सरकारविरोधात असंतोष धुमसत असून त्यापूर्वी तीन दिवस पाण्याविना होणारे हाल लोकांनी मुकाट्याने सहन केले होते. परंतु चौथा दिवस उलटूनही पुरवठा सुरळीत झाला नाही तेव्हा लोक संतापले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लोकांनी केली. 

ओपा जलाशयातून पाणीपुरवठा करणारी वाहिनी खांडेपार येथे फुटली. तेथील राष्ट्रीय हमरस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणातून हा प्रकार घडला. एका महिन्यात तीन वेळा ही दुर्घटना घडली आहे. परंतु जे काम ४८ तासांत सहज होऊ शकले असते, त्याला पाच दिवस लागणे, याबद्दल लोकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत अननुभवी असल्याने व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनाही या कामाचा अनुभव नसल्याने हा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. प्रसारमाध्यमांनी एकमुखाने सरकारच्या या अनास्थेचा निषेध केला. 

दोन तालुक्यांतील लोकांचे या काळात अतोनात हाल झाले. लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले व टँकरवाल्यांनी त्यांना लुबाडले. गोव्याला मुख्यत: दोन धरणांमधून पाणीपुरवठा होतो व ती ४०ते ५० कि.मी. दूर आहेत. लोकांनी व सरकारने पारंपरिक जलस्रोतांकडे- तलाव व विहिरींकडे दुर्लक्ष केले व ते पूर्णत: प्रदूषित झाले आहेत. गोव्यात प्रतिवर्षी ११६ इंच पाऊस पडत असता पाणीपुरवठा योजना कार्यक्षम का केली जात नाही, असा सवाल उपस्थित होत असून या योजनांचे विकेंद्रीकरण केले जावे, अशी मागणी झाली. 

सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडेही असे तातडीने काम करण्यासाठी लागणारे तंत्रकौशल्य उपलब्ध नाही. शिवाय या खात्यात अनास्था आणि बेफिकिरीही झिरपली आहे. या प्रकरणात माजी बांधकाम मंत्री- ज्यांनी २० वर्षापेक्षा अधिक काळ हे खाते सांभाळले- सुदिन ढवळीकरांवर तर मंत्रिमंडळातील सदस्यांनीही दोषारोप केले.

रस्त्याचे काम करताना दरडी कोसळून जलवाहिनीला धोका उत्पन्न झाला असेल तर बांधकाम खात्याच्या लक्षात ते कसे आले नाही, असाही सवाल उत्पन्न झाला आहे. ज्या कंत्राटदाराने रस्त्याचे काम केले, तो बांधकाम खात्याला जुमानत नाही व त्याचे वरिष्ठ नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप झाला. 

तज्ज्ञांचे म्हणणे होते की अशा प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी लष्कराच्या अभियांत्रिकी- गॅरीसन इंजिनीअर्स- विभागाची मदत घेण्याचा पर्याय असता राज्य सरकारला त्याचा विसर पडला व साऱ्यांच्याच टीकेचा विषय ठरलेल्या बांधकाम खात्याकडे हे महत्त्वाचे काम सोपविण्यात आले. जोरदार पावसामुळे हे प्रकरण खोळंबले असल्याचा बांधकाम खात्याचा दावाही न पटणारा आहे. पावसाळ्यातही कल्पकता वापरून हे काम करता येऊ शकले असते. पाच दिवसांतही ते पूर्ण करता न येणो हे सरकारच्या अपयशाचे द्योतक असल्याचा सूर ऐकू आला. 

या प्रकरणाचा निष्कर्ष असा की गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे राजकीयीकरण झाले आहे. त्यामुळेही ते भ्रष्ट आहे, निष्क्रिय आहे आणि नेते व अधिकारी यांचे साटेलोटे निर्माण झाले आहेत. त्यामुळे कोणीही त्यात सुधारणा घडवून आणण्यास धजत नाही. परिणामी लोकांच्या वाटय़ाला नेहमी अडचणी येत असतात व पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहणे ही त्याची केवळ एक झलक आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीPramod Sawantप्रमोद सावंतwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात