शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांचे रुदन

By admin | Updated: October 8, 2015 04:34 IST

देशात रा.स्व.संघ आणि त्या परिवाराशी संबंधित लोक एकप्रकारचा कथित उन्माद निर्माण करीत असताना आणि जातीय व धार्मिक तेढ वाढीस लागत असताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी

देशात रा.स्व.संघ आणि त्या परिवाराशी संबंधित लोक एकप्रकारचा कथित उन्माद निर्माण करीत असताना आणि जातीय व धार्मिक तेढ वाढीस लागत असताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी त्यांचे मौन तोडण्यास तयार नसल्याचा निषेध म्हणून देशातील काही साहित्यिकांनी त्यांना भूतकाळात मिळालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहेत. या सात जणांमध्ये पंडित नेहरु यांची पुतणी नयनतारा सेहगल आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष अशोक वाजपेयी यांचाही समावेश आहे. लोकशाहीने त्यांना जसा पुरस्कार प्राप्त करण्याचा हक्क दिला आहे तसाच मिळालेला पुरस्कार परत करण्याचाही अधिकार दिला आहे. त्यात कोणाला काही आक्षेप असण्याचे कारण नाही. याआधी देशातील ‘पद्म’ पुरस्कार प्राप्त केलेल्या काही व्यक्तींनी तसेच लष्करी सेवेतील काही जवानांना शौर्य गाजविल्याबद्दल मिळालेली शौर्य पदकेही परत केली आहेत. विद्यमान सरकारच्या एखाद्या कृती वा उक्तीचा निषेध म्हणून असे निर्णय घेतले जातात. याचा अर्थ व्यक्तिगत निषेध व्यक्त करण्याचा तो एक सभ्य मार्ग असतो वा मानला जातो. परंतु यात साऱ्यांचीच एक गफलत होत असते. साहित्यिकाचा त्याच्यातील साहित्यिक गुणांबद्दल आणि जवानाला त्याने गाजविलेल्या शौर्याबद्दल पुरस्काराने वा शौर्यपदकाने गौरव केला जातो. तर समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्द्ल पद्म पुरस्कार प्रदान केला जातो. केवळ शौर्य पदकेच नव्हेत कर पद्म पुरस्कार किंवा साहित्य अकादमी वा संगीत नाटक अकादमी आदिंच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार देशातील जनतेच्या वतीने दिले जातात असे मानले जाते. पद्म पुरस्कारांच्या बाबतीत तर हा गौरव संपूर्ण देशाच्या वतीने देशातील प्रथम नागरिकाच्या हस्ते केला जातो. स्वाभाविकच जेव्हां केव्हां असा गौरव वा असे पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हां त्यात प्रस्थापितांचा निषेध होतो वा नाही आणि या निषेधाचा काही परिणामही होतो वा नाही हे सांगणे अवघड असले तरी जनतेचा मात्र त्यातून नक्कीच अवमान होत असतो. यामागील तत्वदेखील अगदी साधे आहे. एरवी साहित्यिकाच्या किंवा कलेच्या प्रांतातील लोक सरकारने एखादा कृपालोभ केला की म्हणतात, उपकार केले नाहीत. सरकार आमचे व आम्ही निवडून दिलेले आहे. मग अशावेळी अचानक सरकार भाजपा वा काँग्रेसचे कसे होऊन जाते?