शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

विवाद्य मुद्दा अस्पर्श

By admin | Updated: March 25, 2016 03:30 IST

राज्यघटनेने दलित आणि आदिवासींना शिक्षणात तसेच सरकारी नोकऱ्यात बहाल केलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी उद्या प्रत्यक्ष घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जरी केली तरी आपण ती

राज्यघटनेने दलित आणि आदिवासींना शिक्षणात तसेच सरकारी नोकऱ्यात बहाल केलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी उद्या प्रत्यक्ष घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जरी केली तरी आपण ती मानणार नाही, असे सांगून हे आरक्षण कायमस्वरुपी राहील, ते रद्द केले जाणार नाही अशी ग्वाही देतानाच आमचे सरकार ते रद्द करणार असल्याची आवई आपले विरोधक उठवित असल्याचा आरोप पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केला असला तरी हे विरोधक म्हणजे नेमके कोण याबाबत मात्र संदिग्धता बाळगली आहे. याआधी वाजपेयी पंतप्रधान असतानाही असाच प्रचार केला जात होता असेही ते म्हणाले. वस्तुत: आरक्षणाच्या विषयाला रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीच अलीकडच्या काळात हात घातला होता. आरक्षणाच्या धोरणाचा नव्याने विचार केला गेला पाहिजे असे विधान करुन त्यांनीच अशा प्रचारास सुरुवात केली. त्यानंतरदेखील संघाने आणि खुद्द भागवत यांनी बरीच उलटसुलट विधाने केली. पण तरीही पंतप्रधानांनी आरक्षणासंबंधीचा सध्या जो वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे त्याबाबत मात्र चकार शब्द काढलेला नाही. खुद्द त्यांच्या गुजरात राज्यातील पाटीदार, हरयाणातील जाट, महाराष्ट्रातील मराठा हे समाज अन्य मागास वर्गांसाठी असलेल्या आरक्षणाची मागणी करीत आहेत तर धनगर आणि तत्सम काही जाती आरक्षणाचा संवर्ग बदलून मागत आहेत. परंतु त्यावर मोदी यांनी काहीही भाष्य न करता अनुसूचित जाती आणि जमाती यांना घटनेने जे आरक्षण दिले आहे त्यात बदल होणार नाही असे सांगून आता नव्याने कोणालाही आरक्षण दिले जाणार नाही असे तर सूचित केले नाही? योगायोगाने ज्या तीन राज्यांमध्ये आरक्षणाचा मुद्दा हिंसक आंदोलनाच्या टप्प्यात पोहोचला आहे त्या तिन्ही राज्यात भाजपाचेच सरकार आहे. आंदोलकांपुढे झुकून हरयाणा सरकारने जाट समाजाला अन्य मागासवर्गात प्रवेश देण्यासाठी विधिमंडळात ठराव संमत करण्याची तयारीदेखील करुन ठेवली आहे. अर्थात हा ठराव संमत झाला तरी आरक्षणाची पन्नास टक्क््यांची कमाल मर्यादा ओलांडण्यास अनुमती न देण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका असल्याने न्यायालयच काय ते परस्पर पाहून घेईल आपण त्या वादात पडायचे काही कारण नाही असा सोयीस्कर पवित्रा यात धारण केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे पंतप्रधान सरकारी संस्था आणि कार्यालयांमधील आरक्षणाची चर्चा करीत असताना त्यांचेच एक सहकारी मंत्री रामविलास पासवान यांनी खासगी क्षेत्रातील आरक्षणाच्या मागणीचा पुनरुच्चार केला असून वाढत्या नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी असे पाऊल उचलणे नितांत गरजेचे असल्याचेही म्हटले आहे. आदिवासींच्या जमिनी आणि या जमिनीखालील खनिजे हस्तगत केली जाऊन आदिवासींना देशोधडीला लावले गेल्याने ते दहशतवादाकडे झुकले असे पासवान यांचे या संदर्भातील निरीक्षण आहे. त्यांनी केलेली ही मीमांसा नवी असली तरी त्यांनी केलेली मागणी मात्र जुनीच असून खासगी क्षेत्राने आजवर तरी तिला दाद दिलेली नाही.