शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
3
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
4
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
5
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
7
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
8
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
9
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
10
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
11
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
12
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
13
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
19
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
20
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने घेतली आयपीएलची विकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 02:11 IST

कोरोनामुळे अडखळलेल्या अर्थचक्राला मंद का होईना, वेग देण्याचे काम आयपीएलमुळे होत होते. लाखो क्रिकेटप्रेमी घरी थांबू लागले हाही फायदाच होता.

ठळक मुद्देआयपीएलसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेचे नियोजन एका रात्रीत होत नसते. हे नियोजन झाले तेव्हा केंद्रातले, राज्यातले सरकार आणि बव्हंशी जनतादेखील कोरोनाचे संकट संपत आल्याच्या भ्रमात होती.

सृकृत करंदीकर

चौदाव्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) ची अखेर झालीच. अनिश्चित कालावधीसाठी ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) घ्यावा लागला. ही स्पर्धा ज्या सहा शहरांमध्ये खेळली जात होती, त्या सर्वच शहरांत कोरोनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. मैदानाच्या चोहोबाजूने कोरोना दबा धरून बसलेला आहे, मैदानाच्या अवतीभोवती लोक मरत आहेत, ऑक्सिजनसाठी तडफडताहेत, अंत्यसंस्कारासाठी रांगा लावत आहेत, त्याचवेळी मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी चालू असल्याचे विदारक चित्र दिसू लागले. या पार्श्वभूमीवर क्रिकेटचा शौक महत्त्वाचा आहे का? रात्रीच्या उजेडात क्रिकेटचा श्रीमंती थाट हवा कशाला? असे सवाल विचारले जाऊ लागले. आयपीएल भरवणारे, क्रिकेट खेळणारे आणि पाहणारे हे सगळे जणू अमानवी, क्रूर असल्याचे भासवले जाऊ लागले. 

वास्तविक ही चर्चा केवळ भावनिक आहे. कोरोना विषाणूमुळे अडखळलेल्या अर्थचक्राला मंद का होईना, पण वेग देण्याचे काम आयपीएल क्रिकेटमुळे होत होते. रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना सामने खेळले जात असल्याने कोरोना साथ पसरण्याचा धोका संपला होता. दररोज संध्याकाळी रंगणाऱ्या थराराचा आनंद लुटण्यासाठी का होईना लाखो क्रिकेटप्रेमी घरी थांबू लागले हाही एक अप्रत्यक्ष फायदाच होता. आयपीएल खेळणाऱ्या प्रत्येक संघाला ‘बायो-बबल’चे नियम अनिवार्य केल्याने तर चार रोजगार वाढलेच, पण कमी झाले नाहीत. एकूणात काय तर आयपीएल क्रिकेटमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे काही कुठे दिसले नाही. आठ देशांमधले खेळाडू एकत्र करत, ‘बायो-बबल’चे नियम पाळत सामने खेळवणे ही कोरोना संकटकाळात फार कठीण कामगिरी होती. खेळाडूंच्या मानसिकतेचीही कसोटी यात पाहिली गेली. नातेवाईक, मित्रपरिवाराला कोरोनाचा धोका असताना क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक खेळाडू सर्वोच्च कामगिरीसाठी घाम गाळत होता. दुसऱ्या बाजूला कोणतेही व्यवहार्य, तर्कशुद्ध कारण न देता आयपीएलच्या नावाने खडे फोडले जात होते. तरीही बीसीसीआयने नेटाने स्पर्धा चालू ठेवली. फक्त क्रिकेटच कशाला पुण्यासारख्या शहरात आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धाही कोरोनाच्या काळातच खेळल्या गेल्या. पण, क्रिकेटएवढे ग्लॅमर त्याला नसल्याने बहुधा त्यावर कोणी टीका केली नाही. शेवटी कोरोनानेच आयपीएल थांबवली. खेळाडूंनाच कोरोनाने गाठल्याने बीसीसीआयपुढचे पर्याय संपले.   

आयपीएलसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेचे नियोजन एका रात्रीत होत नसते. हे नियोजन झाले तेव्हा केंद्रातले, राज्यातले सरकार आणि बव्हंशी जनतादेखील कोरोनाचे संकट संपत आल्याच्या भ्रमात होती. याला बीसीसीआयदेखील अपवाद नव्हती, तरी बीसीसीआयने सहाच शहरांत सामने खेळवण्याचा सुज्ञपणा दाखवला. स्पर्धेतील संघांसाठी काटेकोर नियमावली केली. चेन्नई, मुंबईत पहिल्या टप्प्यातले सामने झाले. सध्या दुसऱ्या टप्प्यातले सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळले जात होते. तिसऱ्या टप्प्यातले सामने येत्या आठवड्यात बंगळुरू आणि कोलकात्यात होणार होते. रंगतदार होत गेलेली आयपीएल अंतिम टप्प्याकडे जात असतानाच कोरोनाने ‘बायो-बबल’ फोडल्याचे स्पष्ट झाले. यात फार काही अघटीत घडले असे नाही. कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेता हे कधी ना कधी घडू शकते, अशी धास्ती होती. नेमके तेच घडले. उद्योगधंदे बंद पडल्याने, पगार कमी झाल्याने, नोकऱ्यांवर टांगती तलवार आल्याने आर्थिक-सामाजिक विवंचनेत अनेकजण आहेत. त्यातच कोरोना कधी कोणाला, गाठेल याचा नेम नसल्याचा ताण वेगळाच. पण म्हणून कोणी जगणे थांबवते काय़? संवदेनशीलता कायम ठेवून आहे ते जगणे आनंदी करत पुढे चालण्याचे तारतम्य दाखवावे लागते. क्रिकेट काय किंवा अन्य कला, क्रीडाप्रकार.. कोरोनाकाळात यातून मिळेल तितके बळ घ्यावे. सकारात्मक ऊर्जा घ्यावी. ‘मरे येक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे,’ हे शाश्वत सत्य तर आहेच की. उन्माद टाळून, आनंद वाटत राहिले तरच सध्याचे दिवस सोपे होतील. क्रिकेटच्या माध्यमातून हे घडत होते. ते थांबले.

(लेखक लोकमत पुणे येथे सहसंपादक आहेत)

टॅग्स :IPLआयपीएल २०२१corona virusकोरोना वायरस बातम्या