शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

सरणकळा आणिमरणकळा

By admin | Updated: January 21, 2016 03:04 IST

‘माझ्या मौतीला या’ असे बिनदिक्कत आवतन देणारा माणूस खरोखर आत्महत्त्या करणार यावर कोणीही विश्वास ठेवत नाही, तर अशा गोष्टी हसण्यावारी आपण नेत असतो.

‘माझ्या मौतीला या’ असे बिनदिक्कत आवतन देणारा माणूस खरोखर आत्महत्त्या करणार यावर कोणीही विश्वास ठेवत नाही, तर अशा गोष्टी हसण्यावारी आपण नेत असतो. त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. जालना जिल्ह्यातील खरपुडीच्या शेषराव सखाराम शेजूळ या शेतकऱ्याने गुरुवारी गावात असे आमंत्रण दिले, त्यावेळी तो असे काही खरोखरच करणार याचा विचारही गावकऱ्यांच्या मनात आला नव्हता; पण गुरुवारी पहाटे अंगणातील लिंबाच्या झाडावर गळफास घेऊन लटकणारा त्याचा मृतदेह पाहून अनेकांच्या काळजाचा ठाव चुकला. टोकाचे पाऊल उचलणारा शेषराव हा मराठवाड्यातील काही पहिलाच शेतकरी नाही. वर्षभरात ३२२८ शेतकऱ्यांनी सरणाची ही वाट निवडली आहे; पण वेगळेपण हेच की शेषरावने त्याचा निर्धार जाहीरपणे बोलून दाखविला. परिस्थितीने गांजून तो निराश झाला होता. कातळावर डोके आपटून कपाळमोक्षच होतो याची त्याला पूर्ण कल्पना होती. परिस्थितीच्या या रेट्यातून उभे राहूच शकत नाही याची जेव्हा खात्री पटली तेव्हा त्याने हा निर्णय घेतला. आपल्या मरणाचे आमंत्रण देऊन जीवनयात्रा संपविणारी ही घटना मन विषण्ण करणारी आहे.नव्या वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यातील ही मराठवाड्यातील सहावी आत्महत्त्या होती. २०१६ हे वर्ष आणखी किती शेषरावांचा घास घेणार हा खरा प्रश्न आहे, तो यासाठी की, अशा अनेक शेषरावांना जगण्याची उमेद वाटेल असे काही घडण्याची सूतराम आशा नाही. खरे तर खरपुडी हे गाव अगदी जालना शहराच्या वळचणीला. विशेष म्हणजे या गावातच देशात नावाजलेले कृषी विज्ञान केंद्र आहे. असे असताना ही घटना घडते. महाराष्ट्रात २००१ पासून पंधरा वर्षांत २०५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. सरकार आत्महत्त्याग्रस्त कुटुंबाला मदत करते; पण वर्षभरात झालेल्या ३२२८ पैकी केवळ १८४१ कुटुंबेच फक्त अशा सरकारी मदतीला पात्र ठरली आहेत. त्यापैकी ९०३ अपात्र ठरली, तर ४८४ प्रकरणे चौकशीसाठी आहेत. सरकारने आत्महत्त्या रोखण्यासाठी दिलेले पॅकेज म्हणजे केवळ मलमपट्टी आहे. पॅकेजऐवजी शेतकरी शेतीत कसा उभा राहील अशा सर्वंकष कृषी धोरणाचीच गरज आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात दुष्काळ आहे आणि या दुष्काळ निवारणासाठी १९००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी वीजबिलात साडेपस्तीस टक्के सवलत, विद्यार्थ्यांना फी माफी, शेतसाऱ्यात सवलत, शेतकऱ्यांना विशेष अपघात योजना, प्रत्येक जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, मका खरेदी केंद्र चालू करणे अशा घोषणा केल्या. वीजबिल सवलती किंवा शेतसारा वसुलीत सवलत या योजना फसव्या आहेत. विहिरीत पाणीच नाही तर बिल येणार कोठून? किंवा महाराष्ट्रात ८५ टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत त्यांना शेतसारा माफ आहे. दुष्काळाने पिचलेले शेतकरीही अल्पभूधारक आहेत. कोरडवाहू शेतकरी आहेत. अशांना वीजबिल माफी, शेतसारा माफीचा काय लाभ? वर्षानुवर्षे त्याच त्या घोषणा करीत राहायच्या म्हणजे शेतकऱ्यांना आपण काही तरी दिले असा आविर्भाव आणायचा ही सत्ताधाऱ्यांची मनोवृत्ती असते. भलेही सत्तेत कोणीही असो. शेतकऱ्यांसमोर सध्या दोन प्रश्न आहेत आणि तेच आत्महत्त्यांचे मूळ कारण. नैसर्गिक आपत्तीमुळे तो हैराण झाला आणि त्याच्यासाठी शेती जुगारासारखी बेभरवशाची झाली आहे. दुसरी समस्या आहे शेतमालाला मिळणाऱ्या बाजारभावाची. आज कोणतेही पीक किमान नफा देणारे आणि शेतकऱ्यांची उभारी वाढविणारे नाहीत. शिवाय बाजारभावावर नियंत्रण करण्यासाठी सरकार बाजारात हस्तक्षेप करीत नाही. यामुळे सरकारने कितीही मलमपट्टी केली तरी मूळ समस्या तशीच राहणार. २००७ साली केंद्र सरकारने सरसकट कर्जमाफी दिली होती. त्यानंतर पुढची तीन वर्षे आत्महत्त्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली होती. याचाही विचार केला जावा, नसता शेतकऱ्यांच्या नशिबी चिकटलेला सरणकळा आणि मरणकळांचा भोग सुटणार नाही.- सुधीर महाजन