शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : शांतिदूतांनाही पडले शांततेचे कोडे!

By किरण अग्रवाल | Updated: March 26, 2020 08:28 IST

Coronavirus : अंग टाकून विसावायच्या संधीचा शोध मात्र प्रत्येकालाच असतो. ही संधी सध्या ‘कोरोना’ने अपवादवगळता सर्वांनाच उपलब्ध करून दिली आहे.

किरण अग्रवाल

धावाधाव... ही तशी अव्याहत चालणारी क्रिया आहे. रोजीरोटीच्या झगड्यात आज प्रत्येकाचीच धावाधाव सुरू आहे. या धावण्याची गती ज्याच्या त्याच्या गरजेनुसार कमी-अधिक असेल; पण कुणी म्हणता कुणी त्याला अपवाद नाही. त्यामुळे या धकाधकीत दोन घटका जरा विसावायला मिळणे अवघडच! तशी संधी मिळाली तरी त्यातील दृश्य-अदृश्यता त्या संबंधितालाच ठाऊक असते. कारण प्रथमदर्शनी दृश्य स्वरूपात एखादी व्यक्ती निवांतपणे पहुडलेली अगर आरामात विसावलेली आढळून येत असली तरी तिचे मन कोणत्या विवंचनेत गुंतले आहे, हे अदृश्य असते, जे दुसऱ्याला कळणारे नसते. अर्थात तसे असले तरी अंग टाकून विसावायच्या संधीचा शोध मात्र प्रत्येकालाच असतो. ही संधी सध्या ‘कोरोना’ने अपवादवगळता सर्वांनाच उपलब्ध करून दिली आहे.

विसावण्याच्या किंवा आरामाच्याही प्रत्येकाच्या आपापल्या त-हा असतात. कुणी चक्क पलंगावर पाठ टाकून लोळण घेत आराम करतो, तर कुणी खुर्चीत निवांत पडून. ब-याच जणांना कार्यालयीन सेवेदरम्यान खुर्चीत मानेखाली हात घेऊन स्थिरावण्याचीही सवय असते. हा स्थिरावणे शब्द मुद्दाम यासाठी की, काम असो अगर नसो, अशांना सतत फिरफिर करण्याची सवय असते. आपण खूप कामात व परिणामी ताणात आहोत असे प्रदर्शन ते नेहमी करत असतात. त्यामुळे मिळाली संधी की, ते पद्धतशीरपणे खुर्चीत स्थिरावतात. तेव्हा हे स्थिरावणे व विसावणे एकच. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मराठी शब्दकोशाचा आधार याला आहे. शरीर थकले, अवयव - गात्र थकले की विश्रांतीची-विसावण्याची गरज भासतेच. पण हल्ली थकावट न बाळगता अगर दर्शवता सतत पळावे-धावावे लागते, हीच खरी समस्या आहे. सामान्य माणसाला तर मरायला जिथे फुरसत नसते, असे म्हटले जाते; तिथे विसावायला कुठे संधी मिळणार? त्याच्यासाठी हक्काचा एकच विसावा असतो, तो अंतिम यात्रेत पार्थिवाला मिळणारा! त्यामुळे रोजच्या धबडग्यात विसावायला मिळण्यासाठी सारेच आसुसलेले असणे अगदी स्वाभाविक आहे.

माझ्या विसाव्याचे स्थान म्हणजे, माझ्या दिवाणखाण्यातील आरामखुर्ची. सकाळी उठल्या-उठल्या बाल्कनीचे दरवाजे उघडून प्रसन्न वारा अंगावर घेत या खुर्चीत विसावायचे व एकेक करून घरी येणारी सारी वर्तमानपत्रे हातावेगळी करायची अशी रोजची परिपाठी. पण, ‘कोरोना’ने त्यात खंड पाडला. अमुक-तमुक वर्षात असे घडले नाही, फर्स्ट टाइम इन हिस्ट्री... यासारख्या संदर्भांनी सध्या अनेक संस्था, आस्थापना ‘लॉकडाउन’ झाल्या आहेत. त्यांच्याही कामात वा सिस्टीममध्ये खंड पडला आहे तसा. त्यामुळे वृत्तपत्रांऐवजी हाती मोबाइल घेत ऑनलाईन वाचन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. यासंबंधीची आतापर्यंत रूढ झालेली सिस्टीम बदलल्याने दार बंद आहे, खुर्ची रिकामी आहे. हे रिकामपणच खरे तर आज मनाची कवाडे सताड उघडी करायला भाग पाडून गेले आहे. एरव्ही गांभीर्याने असो, की अलवार-अलगदपणे; कुठल्याही विषयावर मन:पूत मनात डोकावायला तरी कुठे मिळते? त्यामुळे ‘कोरोना’च्या आपत्ती काळात का होईना, अशी रिकाम्या मनातील भुंग्याची भुणभुण आत्मपरिक्षणाला, चिंतन-मननाला निमंत्रण देणारीच ठरली नसती तर नवल!

विचार आला, कोरोनाच्या धास्तीने आपले जे रिकामपण ओढवलेय; दारावर बसलेल्या कबुतर पक्ष्याच्या दाम्पत्याला त्याची काही कल्पना असेल का? स्वच्छंद-मुक्तपणे विहरण्याच्या गप्पा आपण करतो ख-या, पण तशी मुक्तता-स्वच्छंदता लाभते का कधी आपल्याला? कबुतराच्या गुटर्गुची बोली आपल्याला कळत नाही खरी; पण एरव्ही खुर्चीत पहुडणारी व्यक्ती आज त्यावर दिसत नसल्याबद्दलची चर्चा तर होत नसावी त्यांच्यात? जिवाच्या जिवलगाची ही जोडी रिकाम्या खुर्चीकडे काय म्हणून बघत असावी, व्यक्तीचे नसणे निर्भयतेचे असल्याचे आनंदनिधान त्यांच्या गुटर्गुत असावे, की दाणा-पाण्याची सोय टळण्यासंबंधीच्या हवालदिलतेचे रुदन? कबुतरांकडे आपण नेहमी शांतिदूत म्हणून पाहतो. शांततेचा संदेश देण्यासाठी कबुतरे उडवतो, पण आज या शांतिदूतांनाही ही शांतीच तर खटकत नसावी?.. एक नव्हे, असंख्य अशा प्रश्नांनी रिकामपणातल्या निवांततेतही मनाच्या कवाडावर जणू किलबिलाटच घडवून आणला. खरेच, आपण अशा बाबींकडे इतक्या मोकळ्या व प्रांजळपणे कधी बघतो का, हा प्रश्न त्यातून अधिकच गडद झाला.

सहज म्हणून हे छायाचित्र मी आमच्या साहित्यिक सुहृदाला, स्वानंद बेदरकर यांना पाठविले. त्यांनी लगेच त्यावर प्रसवले,
‘कबुतरांना पडले कोडे, शांततेचे हे कुठले रूप?
आरामखुर्चीचेही म्हणे, बसून बसून वाजले सूप...’

खरेच तर आहे, कबुतरांनाच काय; कुणाही सुजाण-संवेदनशील मनाला शांततेचे हे रूप कोड्यात टाकणारेच ठरावे. शांतता, निरवता, विसावा आदी. काहीही म्हणा, ते हवेहवेसे असले तरी कधी कधी ही शांतता व त्यातून येणारे रिकामपण मनाला खरवडणारेच ठरते. नदीकाठी बसून व पाण्याच्या प्रवाहात पाय सोडून आनंददायी शीत-शांती अनुभवण्याची परिस्थिती राहिली नाही. आता इतक्या कोलाहलाची सवय झालीय की शांतताही खायला उठते. आजची शांतता व त्यातून ओढवलेल्या विसाव्याला तर भयाची किनार आहे. आणि भय कसलेही असो, ते तर अस्वस्थ वर्तमानाच्या विटेवर अस्थिर भविष्याचा इमला उभारू पाहते. तेव्हा त्याला घाबरून चालत नाही. आत्मविश्वास व धीराच्या बळावर भयमुक्ती नक्कीच साधता येते. तेव्हा सद्यस्थितीत ‘कोरोनो’च्या संकटामुळे अनुभवास येणारे भय टाळून, स्वत:च्या, कुटुंबीयांच्या व समाजाच्याही स्वास्थ्यासाठी घरातच विसावणे गरजेचे ठरले आहे. ते सक्तीचे आहे, तसे सावधानतेसाठीचेही आहे. दारावर बसलेल्या कबुतरांचा सांगावाही तोच तर नसेल?

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या