शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

दशकपूर्तीतही मनसे हताशच!

By admin | Updated: March 12, 2016 03:41 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात आगलावू भाषा करीत पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न एकीकडे केला जात असताना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात आगलावू भाषा करीत पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न एकीकडे केला जात असताना, दुसरीकडे या पक्षाला राज्यात ज्या शहरात प्रथम सत्ता मिळाली त्या नाशकात मात्र दशकपूर्तीचा काडीमात्रही आनंद वा उत्साह दिसून येऊ नये, हे त्या पक्षातील हताशा दूर झालेली नसल्याचेच लक्षण म्हणायला हवे. पक्षातील ‘बडवेगिरी’चा प्रत्यय, सुस्पष्ट धोरणांचा अभाव व प्रारंभिक शिलेदारांची गळती यासारख्या कारणातून हे हबकलेपण ओढवले असून, त्यासंबंधीचा ‘उतारा’ केवळ तोडफोडीच्याच कार्यशैलीत शोधला जाणार आहे का, असा प्रश्नही यातून उपस्थित होणे स्वाभाविक ठरले आहे.कोणत्याही राजकीय पक्षासाठी दशकभराची वाटचाल ही काही लहान बाब नसते. कारण हा कालावधी त्या पक्षाच्या जडणघडणीचा काळ असतो. त्यातल्या त्यात जेव्हा एखाद्या ठिकाणची सत्ता मिळते तेव्हा त्या पक्षाची जबाबदारी अधिकच वाढून जाते. अशा स्थितीत काही करून दाखविता आले तर पुढील प्रगतीचे मार्ग आपोआप प्रशस्त होत जातात. पण ‘मनसे’ची याच बाबतीत नादारी आहे. या पक्षाला स्थापनेनंतर एकमेव नाशिक महापालिकेतील सत्ता लाभली. मात्र या सत्तेच्या माध्यमातून नवनिर्माणाचे प्रत्यंतर आणून देणे ‘मनसे’ला जमले नाही. म्हणायला राज ठाकरे लाख म्हणोत की, ‘सत्ता दिल्यास महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन’, पण येथे साधी नाशिक महापालिकेतील नोकरशाही त्यांना गेल्या चार वर्षात सरळ करता आलेली नाही. सध्याचेच उदाहरण घ्या, नाशकातील पाणीपुरवठ्याबाबत जनतेची ओरड वाढली आहे. पालिकेतील सत्ताधारी या नात्याने प्रशासनाला कामाला लावून यासंबंधीच्या तक्रारी दूर करणे अपेक्षित असताना, ‘मनसे’ने स्वत:च टँकर्स सुरू करून आपल्याच अपयशावर शिक्कामोर्तब करून घेतले आहे. पक्ष म्हणून असे करता येत असेल तर ते महापालिकेतील सत्ताधारी म्हणून का करता येऊ नये, असा यातील साधा सवाल आहे. ‘मनसे’च्या स्थापनेनंतर मुंबईपेक्षा नाशकात अधिक जल्लोष केला गेला होता. महापालिकेतील सत्तेखेरीज विधानसभेत शहरातून या पक्षाचे तीन तीन आमदार निवडून गेले होते. पण कुणालाही नवनिर्माण साधता न आल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीनही जागा हातच्या गेल्या. त्यानंतर पक्षात ‘बडवेगिरी’ वाढल्याचा आरोप करीत पक्ष स्थापना काळातील शिलेदार वसंत गिते पक्ष सोडून चालते झाले. पक्षाच्या पहिल्या महापौरपदाचा फेटा ज्यांच्या मस्तकी बांधला गेला ते अ‍ॅड. यतिन वाघ हेदेखील अगदी अलीकडेच पक्षाबाहेर पडले. आणखीही बरीच पडझड झाली आणि त्यातूनच पक्षात सुन्नता आली. पण त्यासंदर्भात कुठे काय चुकते आहे याचे आत्मपरीक्षणच कुणी करायला तयार नाही. तेव्हा केवळ मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून व नव्या रिक्षांच्या जाळपोळीतून पक्षातील ही सुन्नता वा अस्वस्थता दूर करता येईल का हा खरा प्रश्न असून, या प्रश्नाच्या मुळाशी असणारी हताशा यातून समोर येणारी आहे. ‘राजगड’ म्हणविल्या जाणाऱ्या पक्षाच्या नाशकातील मुख्यालयात पक्षाच्या दशकपूर्तीचा मागमूसही आढळून न येण्यामागे तेच कारण आहे.विशेष म्हणजे, राजकारणात आक्रमकता व सत्ता या नेहमीच आकर्षणाच्या बाबी ठरत आल्या आहेत. आज नरेंद्र मोदी व राज ठाकरे या दोघांकडेही वेगवेगळ्या संदर्भात त्या असताना, नाशकातील अनेकजण तुलनेने मवाळपंथीय म्हणविल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेने जात आहेत हे काहीसे अनाकलनीय व कुतुहलाचे असले तरी ते वास्तव आहे. राज्यातील सत्तेत शिवसेनेची स्थिती किती नाजूक आहे हे जगजाहीर असताना असे होते आहे. काही मनसैनिक थेट शिवसेनेत आले आहेत, तर काही ‘व्हाया भाजपा’ येऊ घातले आहेत. तेव्हा याही बाबतीत राज ठाकरे यांचे अपयश वा ‘मनसे’तील घसरगुंडी लक्षणीय ठरणारी आहे. - किरण अग्रवाल