शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नात्यांना नख लावणाऱ्यांना सुबुद्धी दे बाप्पा!

By किरण अग्रवाल | Updated: September 4, 2022 11:25 IST

Bappa give wisdom to those who are trying to nail the relationship : अलीकडे स्वार्थांधता वाढल्याने या घटनाही वाढल्या असून, नात्यांच्या जपणुकीसाठी बाप्पा गणरायालाच साकडे घालण्याची वेळ आली आहे.

-  किरण अग्रवाल

अलीकडील काळात कौटुंबिक कलहांचे प्रमाण वाढले असून, नातेसंबंधांमधील वाद विकोपाला जाताना दिसत आहेत. याच कारणातून होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाणही मोठे आहे, म्हणूनच माणुसकीच्या व नात्यांच्या जपणुकीची बुद्धी द्यावी, अशी विनवणी बाप्पा गणरायाकडे करू या.

नातेसंबंधांना जपणं हे आजकाल खूप जिकिरीचं झालं आहे, कारण प्रत्येकाचंच मी व माझ्यातलं अडकलेपण वाढलं आहे. स्वार्थात नाती तोलली जाऊ लागल्यानं ती तुटण्याचं किंवा डागाळली जाण्याचंही भान बाळगलं जात नाही. परिणामी, समाजमनाला सुन्न करून जाणाऱ्या काही अप्रिय घटना रक्ताच्या नातेसंबंधात घडून येताना दिसतात. अलीकडे स्वार्थांधता वाढल्याने या घटनाही वाढल्या असून, नात्यांच्या जपणुकीसाठी बाप्पा गणरायालाच साकडे घालण्याची वेळ आली आहे.

 नातेसंबंधांबाबत प्रश्न उपस्थित व्हावेत अशा घटना अलीकडे वाढल्या आहेत. शेती नावावर करून देण्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी मुलानेच आईला विष पाजल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात घडला. अवघ्या साडेतीन वर्षांच्या पोटच्या मुलीवर तिच्याच पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची लज्जास्पद घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदली गेली. अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या पोटच्या गोळ्याला कचराकुंडीत फेकून देण्याच्या घटनाही अधूनमधून समोर येत असतात. अशा अन्यही अनेक घटनांची यादी वाढवता येईल, ज्यातून नातेसंबंधातील आदर, विश्वास व मर्यादांचाही गळाच घोटलेला दिसून येईल. का होत चालले आहे हे अधःपतन, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होतो.

 सोशल मीडियाच्या वाढत्या वापरातून माणूस सोशल होतो आहे, असे मारे उच्चरवाने सांगितले जाते. पण, तसे होताना संस्काराचे घडे का पालथे होताना दिसतात? माणसाने माणसाशी माणुसकीनेच वागायला हवे. मात्र, कधी कधी तो कुटुंबातच नातेसंबंधातील आप्तांशीही पशुत्वाने वागताना दिसतो; त्यामुळेच ‘नरेची केला किती हीन नर’ असा प्रश्न उपस्थित होऊन जातो. म्हणायला अशी उदाहरणे ही अपवादात्मकच घडतात, परंतु संपूर्ण समाज मनाला ती अस्वस्थ करून सोडतात आणि तितकेच नव्हेतर, परस्परातील नात्यांना नख लावणारीही ठरतात.

 दुसऱ्यांकडून होणारी अवहेलना किंवा छळवणूक एकवेळ सहन केली जाऊ शकते; पण स्वकीयांकडून तसे घडले तर तो घाव अधिक वेदना देऊन जातो. दुर्दैवाने अशा वेदना जेव्हा वाट्यास येतात तेव्हा व्यक्ती कोलमडून पडल्याखेरीज राहत नाही. हे कोलमडलेपण व्यक्तीला निराशेच्या गर्तेत तर ढकलतेच; शिवाय आत्महत्येच्या अविवेकी विचारापर्यंतही पोहोचविते. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने देशातील आत्महत्यांची जी आकडेवारी व त्याची कारणे दिली आहेत त्यात सर्वाधिक म्हणजे ३३.२ टक्के आत्महत्या कौटुंबिक समस्येतून घडून आल्याचे म्हटले आहे, यावरूनही नातेसंबंधातील नाराजी व दुराव्याचे वाढते प्रमाण किती भयग्रस्त होत चालले आहे हे लक्षात यावे.

 गणरायाच्या आगमनाने सध्या सारे वातावरण भारावले आहे. चैतन्याचा व मांगल्याचा उत्सव सुरू आहे. बुद्धिदाता देवता म्हणून गणरायांना पूजले जाते. संकट, विघ्न, दुःखाचे हरण करून सुख-समृद्धीची प्रार्थना विनायकाकडे केली जात आहे. ती करतानाच माणुसकीची परीक्षा पाहणाऱ्या व नात्यांना नख लावणाऱ्यांना सुबुद्धी दे बाप्पा, अशीही प्रार्थना करू या; इतकेच यानिमित्ताने.