शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

पब्लिसिटीची धांदल, ब्रेनवॉशिंगचा भडिमार, पण प्रबोधनाचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 04:44 IST

माहितीचा पूर प्रचंड, पण योग्य माहितीचा अभावही! त्यावरील उत्तर त्रागा करणे, हताश होण्यात नसून प्रबोधनाच्या अभिनव कल्पना शोधण्यात आहे.

अमृत बंग, सहसंचालक, ‘सर्च’ ‘निर्माण’ या युवा उपक्रमाचे प्रमुख

महाराष्ट्राला सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचा एक उत्तुंग वारसा आहे. समाजशास्त्रज्ञ मिलिंद बोकील मांडतात त्या प्रकारे याच्या किमान तीन मुख्य धारा आहेत. एक, महादेव गोविंद रानडे प्रणीत मंडळीकरण अथवा संस्थात्मक काम उभे करणे आणि त्याद्वारे सामाजिक सेवेचे वा इतर उपक्रम करणे. दोन, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांची विद्रोहाची परंपरा. आणि तीन, गोपाळ गणेश आगरकर, रघुनाथ धोंडो कर्वे यांची प्रबोधनाची, समाजात विवेकवादी विचार पसरवण्याची परंपरा. माझ्या मते आपल्याकडे एक चौथी धारादेखील आहे – ज्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन यांचा समाजातले प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि त्यावर उत्तरे शोधण्यासाठी उपयोग करण्यात आलाय. मात्र त्याविषयी नंतर कधीतरी. 

गेल्या काही दशकांमध्ये होत असलेले सामाजिक कार्याचे बदलते स्वरूप बघता वरीलपैकी तिसरी परंपरा जरा अशक्त झाल्यासारखी दिसते. लोकांना विचार करायला प्रवृत्त करणे, सत्य – असत्य याची शहानिशा करणे, तथ्यांवर आधारित मांडणी व मुद्द्यांचा स्वीकार करणे, प्रश्न विचारणे तसेच प्रश्न विचारायला उद्युक्त करणे, जिज्ञासा व खुलेपणा यावर आधारित विचार प्रक्रिया घडविणे, इ. विविध पद्धतींनी समाजाला अधिक विवेकी व शहाणे करून सोडणे हे अत्यंत महत्त्वाचे काम जरा मागे पडले आहे. आपल्या अवतीभवती असलेला बाबा-बुवांचा सुळसुळाट, विविध सणांच्या आक्रमक उत्सवाचे वाढते स्तोम, आणि जीवनाच्या विविध अंगांमध्ये पसरलेली अवैज्ञानिकता हे बहुधा याचेच परिणाम आहेत. सोशल मीडिया व मार्केटिंगद्वारे प्रचाराचा भडिमार तर मोठ्या प्रमाणात होतो पण त्याचा उद्देश बऱ्याचदा ‘पब्लिसिटी’ वा ‘ब्रेनवॉशिंग’ असतो, प्रबोधन नाही.

या पार्श्वभूमीवर ‘निर्माण क्विझ’ हा एक वेगळा उपक्रम गडचिरोलीतल्या तरुणांसाठी आम्ही करून बघितला. गडचिरोली जिल्ह्यासमोरील महत्त्वाची आव्हाने, जिल्ह्यातील काही उत्तम सामाजिक कामे व कार्यरत युवा, जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासातील काही उत्तुंग बाबी (गडचिरोली म्हणजे निव्वळ मागास असे नाही हे कळण्यासाठी) आणि युवांच्या विकासासाठीचे काही महत्त्वाचे मुद्दे अशांवर आधारित २५ प्रश्न आम्ही काढले. गेल्या दोन वर्षात गडचिरोलीतील ७३ वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेसमधील एकूण ६७०६ विद्यार्थ्यांसोबत आम्ही ही प्रश्नमंजूषा घेतली. 

निव्वळ माहिती देण्याऐवजी  प्रश्न विचारून कुतूहल निर्माण करणे व मग एका आकर्षक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उत्तरे समजावून सांगणे, गंमत यावी आणि लक्ष टिकून राहावे म्हणून स्पर्धात्मक खेळ करणे, मुला-मुलींनी एकमेकांची उत्तरे तपासणे व गुण देणे, आणि शेवटी पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देणे असे या उपक्रमाचे स्वरुप होते. उपदेश देण्याऐवजी उत्सुकता पैदा करण्यावर भर होता. आजकाल अनेक ठिकाणी शिक्षकांकडून ‘मुले लक्ष देत नाहीत’ अशी तक्रार ऐकण्यास मिळते. 

आम्हाला मात्र या ‘गेमिफाईड एज्युकेटिव्ह क्विझ’ला तरुणांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. ६१% युवांना एकूण गुणांपैकी ४०%हून कमी गुण  आणि केवळ २% युवांना ८०%हून अधिक गुण मिळाले यावरून सध्या असलेला योग्य माहितीचा प्रचंड अभावदेखील दिसला. मात्र त्यावरील उत्तर त्रागा करण्यात, हताश होण्यात नसून प्रबोधनाच्या अभिनव कल्पना शोधण्यात व अंमलात आणण्यात आहे हे देखील जाणवले.
    amrutabang@gmail.com

 

English
हिंदी सारांश
Web Title : Publicity blitz, brainwashing rampant, but what about true enlightenment?

Web Summary : Amrut Bang highlights the decline of rational discourse amidst publicity. 'Nirman Quiz' in Gadchiroli sparked curiosity among youth, revealing information gaps. Innovative enlightenment is key.
टॅग्स :SocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया