शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

कोरोना बाधितांचा द्बेश करणे चुकीचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:43 PM

जनता कफ्यूचे पालन करा..

ठळक मुद्देधुळेकरांनो शहरात विनाकारण फिरू नकासंसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीशहरात लॉकडाऊन असतांनाही नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघनधुळेकरांनी या महामारीच्या काळात एकमेकांना साथ द्या

चंद्रकांत सोनार ।शहरातील एका वयोवृद्ध महिलेचा कोरोना बाधित असल्याने अंत्यसंस्कारासाठी अनेकांनी पाठ फिरवली अशा वेळी मुस्लिम बांधवांनी मयताच्या मुलास आधार देत़ अंत्यविधी पार पाडला़ कोरोनाचे संकट कधीही केव्हाही व कुणावरही येवू शकते़ मात्र प्रत्येकाने माणुसकी विसरून चालणार नाही़ धुळेकरांनी या महामारीच्या काळात एकमेकांना साथ द्या! तरच आपण या युध्दात जिंकू शकतो़ असे मत मनपा उपायुक्त शांताराम गोसावी यांनी ‘लोकमत' शी बोलतांना व्यक्त केले़प्रश्न : अंत्यसंस्कारासाठी होणाऱ्या विरोधात विषयी काय सांगालउत्तर : करोना विषाणूमुळे माणसाची जीवनशैली खूप मोठा बदल झाला आहे़ या साथीच्या आजारामुळे प्रत्येकांनी जात, पात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रांत देश यांच्या मयार्दा ओलांडलेली आहे़ त्यामुळे विषाणूची लागण कधीही केव्हाही व कोणालाही होऊ शकते़ त्यासाठी काळजी व खबरदारी घेण्याची गरज आहे़ बाधिता मनात द्वेश ठेवूऩ मृत्यूनंतर अत्यसंस्कारास विरोध चुकीचा आहे़प्रश्न : सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल काय सांगालउत्तर : कोरोनाची लागण झाल्यास अनेकांकडून मोठ्या प्रमाणात तिरस्कार केला जातो़ त्यामुळे बाधितावर मुलाने अग्निडाग दिल्यास नकार दिल्याने एका नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाºयांने स्व:ता अग्निडाग देण्याची भुमिका घेतली़ आई-वडील मुलांसाठी करोडो रूपयांची मालमत्ता जमा करून ठेवतात व एैनवेळी बाधितामुळे त्यांचा मृृत्यू झाल्यास अग्निडाग देण्यास नकार देतात हे मात्र चुकीचे आहे़प्रश्न : कोरोनावर मात करण्यासाठी काय करावे?उत्तर : कोरोनाच्या पार्शभूमीवर देशात लॉकडाऊन केले आहे़ लॉकडाऊन संपल्यानंतरही आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे़ स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, वेळो-वेळी हात धुणे, शहरातील सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, विशेषत: गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन शांतराम गोसावी यांनी केले़जनता कफ्यूचे पालन करा..कोरोनाच्या विषाणुमुळे उध्दवनाच्या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली आहे़ या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी व निर्माण झालेल्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी सोमवारी १ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पावेतो संपुर्ण दिवसभर जनता कफ्यू ठेवण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ नागरिकानी नियमाचे पालन करावे़          धुळेकरांनो शहरात विनाकारण फिरू नकाकोरोनावर सध्या औषधी उपलब्ध नाहीत़ त्यामुळे काळजी घेणे एकमेव उपाय आहे़ त्यासाठी प्रत्येकाने आपला जीव कसा वाचविता येईल याची काळजी घेणे महत्वाचे आहे़ शहरात लॉकडाऊन असतांनाही नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत फिरतात़ बाहेर विनाकारण फिरणे म्हणजे तुम्हीच या आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे़

टॅग्स :Dhuleधुळे