शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

दहा रुपयांमध्ये चप्पल मिळते का हो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:40 IST

धुळे - महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कमी मिळकत असलेल्यांचे जगणे कठीण झाले आहे. असे असले तरी तुटपुंज्या मानधनावर ...

धुळे - महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कमी मिळकत असलेल्यांचे जगणे कठीण झाले आहे. असे असले तरी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवालांचा चप्पल भत्ता मात्र केवळ दहा रुपये इतका आहे.

पूर्वीपासून कोतवालांना मानधनासोबतच चप्पल भत्ता दिला जातो. महागाई वाढली तरी त्यात कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे दहा रुपयात कुठे चप्पल मिळते का हो ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

तलाठी कार्यालयात कोतवाल मदतनीस म्हणून काम पाहतात. शेतसारा गोळा करण्यासाठी तलाठ्याला मदत करतात. तसेच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते त्यावेळी पंचनाम्यासाठी मदत करतात. मात्र त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. पदोन्नती मिळावी अशी मागणी कोतवाल संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

२०११ पासून पदोन्नती नाही ...

कोतवालांना २०११ सालापासून पदोन्नती मिळालेली नाही. त्याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. पदोन्नतीच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलने, उपोषणे व मोर्चेही काढले; मात्र काहीएक फायदा झाला नाही. तुटपुंज्या मानधनावर जिल्ह्यातील कोतवालांना काम करावे लागत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

कामांची यादी भली मोठी ..

तलाठ्याचा मदतनीस म्हणून कोतवाल काम करतो. गावस्तरावर महसूल विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांना मदत करणे. दुष्काळ, अतिवृष्टी, शेतीचे नुकसान झाल्यास शेतात जाऊन पंचनामा करण्यासाठी मदत करणे. दुष्काळ यादी, गावातील नुकसानीची माहिती प्रशासनाला देणे, त्यांना सहकार्य करणे . गावस्तरावर राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची देखभाल करणे आदी कामे कोतवालांना करावी लागतात .

अपुऱ्या मानधनात कसे भागणार ?

महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोलसह, गॅस व इतर वस्तूचे दर सातत्याने वाढत आहेत. वाढत्या महागाईप्रमाणे आमच्या मानधनात कोणतीही वाढ होत नाही. आमचे मानधन जसेच्या तसे आहे. चप्पल भत्तासाठी केवळ दहा रुपये दिले जातात. दहा रुपयात चप्पल मिळणे शक्य तरी आहे का? महागाई वाढत आहे त्यानुसार मानधनातही वाढ करावी अशी आमची मागणी आहे.

- कोतवाल

गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मानधनात वाढ झालेली नाही. मानधन वाढावे यासाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. मागच्या १० वर्षांपासून पदोन्नतीचा प्रश्नही रखडला आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहोत. मानधन वाढवून देण्याची आवश्यकता आहे.

- कोतवाल