शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकाची कामे झाली?संघटनांचा विरोध : शालेय पोषण आहारासाठी ‘सेंट्रल किचन’ पध्दत राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:23 AM

गावपातळीवर करावयाची कामे शिक्षकांना सोपविली जातात. एवढेच नव्हे तर कोरोना काळात गावातील रुग्णांचा सर्वे करण्याची जबाबदारीही शिक्षकांनी जिवाची पर्वा ...

गावपातळीवर करावयाची कामे शिक्षकांना सोपविली जातात. एवढेच नव्हे तर कोरोना काळात गावातील रुग्णांचा सर्वे करण्याची जबाबदारीही शिक्षकांनी जिवाची पर्वा न करता पार पडली. परंतु अध्यापनासोबतच शालेय पोषण आहाराची जाबाबदारीही शिक्षकांना देवून शासनाने एक प्रकारे शिक्षकांवर अन्यायच केला आहे, अशा प्रतिक्रिया आहेत. दररोज खिचडीसाठी साहित्य जमविणे, शिजविणे आणि वाटप करणे, नोंदी ठेवून ऑनलाईन माहिती भरणे अशी सारी कामे त्यांना करावी लागतात. परंतु सध्या कोरोनामुळे पोषण आहार शिजविणे बंद असल्याने दिलासा आहे.

शिक्षकांची कामे

शिक्षकांचे मुळ काम हे अध्यापनाचे आहे. पंरतु शासनाला विसर पडला.

अध्यापनाच्या व्यतिरिक्त गावातील इतरही कामे करुन घेतली जातात.

सरकारचा कोणताही सर्वे शिक्षकांच्या माथी मारला जातो.

कोरोना रुग्णांचा सर्वे करण्याचे कामही त्यांना सोपविले होते.

यामुळे अध्यापनावर परिणाम होत आहे.

शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक

प्रत्येक शाळेत एखाद्या शिक्षकाला इतर कामे सोपविलेली असतात. पंरतु त्यांना अध्यापनाचे कामही असते. काही शाळांमध्ये मात्र त्यांच्या स्तरावर शिक्षण सोडून इतर कामांची जबाबदारी एका शिक्षकावर सोपविल्याची उदाहरणे आहेत.

असे असले तरी शिक्षकांना त्यांचे मुळे काम करावेच लागते अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

निराधार महिलांना काम

खिचडी शिजविण्यासाठी शासनाकडून १५०० रुपये मानधन दिले जाते. त्यासाठी गावातील निराधार महिलेस रोजगार मिळतो. परंतु विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळेत एक महिला हे काम पूर्ण करु शकते आणि तिला या मानधनात काम करणे परवडते. पंरतु विद्यार्थीसंख्या जास्त असलेल्या शाळेत खिचडीसाठी संर्व तयारी करुन शिजविणे आणि वाटप करणे एकट्या महिलेस शक्य होत नाही. दोन-तीन महिला लावल्या तर त्यांना ऐवढे मानधन परवडणार नाही. त्यासाठी खिचडी शिजवायला शिक्षकांनाच मदत करावी लागते.

एक शिक्षकी शाळेचे हाल

जिल्ह्यात पटसंख्या कमी असलेल्या एक शिक्षकी शाळा ८३ आहेत. या शाळांमध्ये एकाच शिक्षकाला सर्व कामे करावी लागतात.

अध्यापनाच्या कार्यासह कार्यालयीन कामे तर करावीच लागतात. त्यामुळे या शिक्षकांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

एक शिक्षकी शाळेत संबंधित शिक्षकाची मोठी गैरसोय होते.

शिक्षक संघटना काय म्हणतात

शालेय पोषण आहार शिजवून वाटप करण्याचा ससेमिरा शिक्षकांकडून काढून घ्यावा. त्यामुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याने खिचडीसाठी स्वतंत्र यंत्रणा शासनाने निर्माण करण्याची गजर आहे. ही मागणी राज्यस्तरावरुन होत आहे.

- राजेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती, धुळे

शिक्षकांना अध्यापनाचे काम सांभाळून खिचडीसाठी साहित्य आणणे, नोंदी ठेवणे, ऑनलाईन माहिती सादर करणे शक्य होत नाही. शिक्षणावर परिणाम होतो. गुजराथ, राजस्थान प्रमाणे मध्यवर्ती किचन योजना शासनाने राबवावी अशी संघटनेची मागणी आहे.

- शिवानंद बैसाणे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती, धुळे