शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:42 IST

भूषण चिंचोरे धुळे - कोरोनाकाळानंतर समाजातील अनेकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते आहे. यामुळे ताणतणाव वाढून कलह निर्माण झाले ...

भूषण चिंचोरे

धुळे - कोरोनाकाळानंतर समाजातील अनेकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते आहे. यामुळे ताणतणाव वाढून कलह निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत संवाद ठेवणे महत्त्वाचा आहे. संवादाची दरी निर्माण झाली तर मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड, आर्थिक नुकसान व एकाकी पडल्याने नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. नैराश्य घालवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी यांच्याशी मनमोकळा संवाद साधणे आवश्यक आहे.

मन हलके करणे हाच उपाय

- कोरोनाच्या काळात नेहमीपेक्षा जास्त संपर्क आल्याने समायोजन करणे कठीण गेले.

- बेरोजगारी व आर्थिक संकटे आल्याने नैराश्य व चिंतेचे विकार वाढले आहेत.

- मन हलके करणे, व्यक्त होणे हाच यावरच उत्तम उपाय आहे.

- कुटुंबातील सदस्य, सहकारी व मित्रांशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

नोकरी गेल्यामुळे व आर्थिक संकटांमुळे घरा-घरात कलह वाढले आहेत. तसेच घरातच राहिल्याने नेहमीपेक्षा अधिक संपर्क आल्यानेही एकमेकांना समजून घेणे कठीण गेले. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. संवाद वाढवणे आवश्यक आहे.

- डॉ. तुषार भट, मानसोपचार तज्ज्ञ

कोरोनानंतर नैराश्य वाढले आहे. त्यामुळे व्यसनाधीनतादेखील वाढली आहे. त्यामुळे कलह निर्माण झाले आहेत. निराशा वाटत असेल तर जवळच्या व्यक्तींशी बोलणे, मन मोकळे करणे गरजेचे आहे. गरज भासली तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.

- डॉ. जीवन पवार, मानसोपचार तज्ज्ञ