शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जिव्हाळा तर्फे ‘संवाद तृतीयपंथीयांशी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST

धुळे : तृतीयपंथी हा घटक आजही दुर्लक्षित असून तृतीयपंथीयांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांनादेखील रोजगार, शिक्षण व संरक्षणाची उपलब्धी ...

धुळे : तृतीयपंथी हा घटक आजही दुर्लक्षित असून तृतीयपंथीयांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांनादेखील रोजगार, शिक्षण व संरक्षणाची उपलब्धी निर्माण व्हावी यासाठी तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तृतीयपंथीयांचे हक्क, संरक्षण व कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या राज्य अशासकीय सदस्या वर्षा विद्या विलास यांनी केले.

जिव्हाळा सामाजिक संस्थेच्या वतीने धुळे येथील मालेगाव रोड वरील बर्फ कारखान्याच्या मागील परिसरातील श्री इच्छापूर्ती काळेश्वरी (काळूबाई) मंदिरातील तृतीयपंथीयांसोबत संपन्न झालेल्या ‘संवाद तृतीयपंथीयांशी’ या उपक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिव्हाळा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रार निवारण समितीचे आमंत्रित सदस्य ॲड. विनोद बोरसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मुंबई येथील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. डाॅ. प्रभा तिरमिरे यांनी सांगितले की, तृतीयपंथीयांकडेसुद्धा सामान्य माणसाइतकीच बुद्धिमत्ता, कौशल्य व माणुसकी असते. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रुती क्षीरसागर यांनीदेखील तृतीयपंथीयांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वतीनंदगिरी ऊर्फ पार्वती परशुराम जोगी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला संदल जोगी, स्वरा जोगी, विशाखा जोगी, जानवी जोगी, अंकिता जोगी आदी तृतीयपंथी उपस्थित होते.