शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

धुळे जिल्ह्यातील ४४६ बालकामगार शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:30 AM

राष्टÑीय बालकामगार प्रकल्पाच्या जिल्ह्यातील १८ शाळांमध्ये दाखल

अतुल जोशी।आॅनलाइन लोकमतधुळे : ‘बालपण देगा देवा...’ असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी, मनसोक्त खेळायचे, आनंद लुटांयचा असा हा काळ असतो. पण हे सुखं मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. काही बालके बालवयातच शिक्षणाऐवजी मजुरी करीत परिवाराला आर्थिक हातभार लावतात. अशांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पामार्फत केले जाते. जिल्ह्यात २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ४४६ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आलेले आहे.भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील बालकामगारांची शैक्षणिक स्थिती जाणून घेतली असता, कामगार कार्यालयातून वरील माहिती मिळाली.ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात विटा उचलायच्या, कचरा गोळा करायचा, शेतात काम करायचे अशी अनेक कामे बालकांना करावी लागतात. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येतो. स्वयंसवी संस्थामार्फत दर तीन वर्षांनी ९ ते १४ वयोगटातील बालकामगारांचा शोध घेतला जातो. त्यांना दोनवर्षे बालकामगार प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात येते. याठिकाणी त्यांना तिसरी व चौथीच्या वर्गात दाखल करण्यात येते. या बालकांना प्राथमिक शिक्षणासोबतच व्यवसाय पुरक शिक्षण दिले जाते.जिल्ह्यात राष्टÑीय बाल प्रकल्पांतर्गत ४० शाळा मंजूर असून आता फक्त १८ शाळा कार्यरत आहेत. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात ४४६ बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात असल्याची माहिती राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रोग्राम अधिकारी देविदास बडगुजर यांनी दिली. एका विशेष प्रशिक्षण केंद्रात दोन प्राथमिक शिक्षक, एक लिपिक व एक शिपाई कार्यरत असतो. प्रशिक्षण केंद्रात दाखल झालेल्या प्रत्येक बाल कामगाराला दरमहा ४०० रूपये विद्यावेतन दिले जाते. दोन वर्षे प्रशिक्षण केंद्रात राहिल्यानंतर या विद्यार्थ्यांना वयानुरूप इतर खाजगी शाळांमध्ये दाखल करण्यात येत असते. त्याची जबाबदारी मात्र बालकामगारांच्या पालकावर असते. गेल्या १४ वर्षांपासून जिल्ह्यात या प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरवर्षी प्रकल्पात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी त्यांच्या गळतीचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहात राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. दरम्यान बालकामगार प्रथेच्या उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण