शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा अंतर्गत ९७५ जणांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचे शिरपूर प्रशासनातर्फे काटेकोरपणे पालन होत आहे. परंतु या संचारबंदीमुळे ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या मजुरांना ...

राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचे शिरपूर प्रशासनातर्फे काटेकोरपणे पालन होत आहे. परंतु या संचारबंदीमुळे ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या मजुरांना रोजगाराची चिंता सतावत होती. काम मिळत नसल्याने आदिवासीबहुल परिसरातील अनेक तरुण मजूर स्थलांतरित होत असल्याची माहिती प्रशासनाच्या लक्षात आली. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात कामासाठी येणाऱ्या मजुरांना त्यांच्याच परिसरात मनरेगा अंतर्गत रोजगार मिळवून देण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे.

जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या आदेशानंतर प्रांताधिकारी डॉ़. विक्रमसिंग बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार आबा महाजन यांनी महसूल प्रशासन, वनविभाग आणि पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रोजगार हमी योजना विभागाची संयुक्त बैठक झाली़ या बैठकीनंतर आमदार काशिराम पावरा यांनी लागलीच आदिवासी भागात प्रत्यक्ष जाऊन मनरेगा अंतर्गत कामे सुरू केलीत़ त्यानुसार ११८ गावांपैकी सद्यस्थितीत ३७ गावात २०६ कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या सहा कामांमधून तब्बल ९७५ मजुरांना कामे मिळाली आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जॉबकार्ड असलेल्या मजुरांनी काम मागितल्यास त्यांना शासनाकडून काम दिले जाते. केलेल्या कामांची नोंद मस्टरवर केली जाते. मस्टर संपल्यावर ८ ते १० दिवसात मजुरांना दिवसाला प्रती दिवस २४८ रुपये मजुरी सरळ त्यांच्या बँक खात्याद्वारे मिळते. अनेकवेळा तांत्रिक चुकांमुळे मजुरांच्या बँक खात्यात पैसे पडत नाहीत. त्यामुळे त्यांना बँकेचे हेलपाटे घालावे लागतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

मजुरांचे स्थलांतर थांबणाऱ़़

मनरेगाच्या कामांची आदिवासी परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील तरुण मजुरांना काम मिळाले नाही तर ते मध्य प्रदेशची सीमा जवळ असल्याने तिथे काम करण्यास जातात. त्यामुळे त्यांच्या परिवारांना कोरोना काळात अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने कोरोना काळात अखंडितपणे काम दिल्यास येथून मजुरांचे स्थलांतर होणार नाही यांची दक्षता घेणे आवश्यक आहे़ तसे झाल्यास मजुरांचे स्थलांतर थांबेल़ तालुक्यातील वकवाड आणि दुर्बळ्या येथील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहे़ प्रांताधिकारी डॉ.बांदल व तहसिलदार महाजन यांनी वकवाड आणि दुर्बळ्या परिसरातील स्थलांतर रोखण्यात यश मिळाले. प्रशासनाने या मजुरांना मनरेगा अंतर्गत त्यांच्याच परिसरात काम मिळवून दिले. या परिसरातील मनरेगा अंतर्गत होणारे काम आता अंतिम टप्प्यात आहे. येथील मजूर मनरेगाच्या नवीन कामांच्या प्रतीक्षेत आहेत.

सिंचनाच्या ४ कामांवर ३३ मजूर, रोपवाटिका १ एकरावर २० मजूर, सीसिटीच्या २-१९९, शौचखड्डा १-१९, रस्ता खडीकरण १-४८ , घरकुल - १९७ कामे त्यावर ६५६ मजूर असे एकूण ६ प्रकारच्या कामातून सुमारे १ हजार मजुरांना संचारबंदी काळात रोजगार हमी योजनेद्वारा रोजगार मिळाला आहे. येथील विवेकानंद रिसर्च अ‍ॅण्ड फाऊंडेशनचे विनोद माळी यांच्या देखरेखखाली कामे केली जात आहेत़