शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांपासून तीन रोहीत्र नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

ईट : भूम तालुक्यातील ज्योतीबाचीवाडी गावासाठी वीजपुरवठा करणारे वीज वितरण कंपनीचे १५ केव्हीए क्षमतेचे सिंगल फेजचे तीन रोहीत्र गेल्या ...

ईट : भूम तालुक्यातील ज्योतीबाचीवाडी गावासाठी वीजपुरवठा करणारे वीज वितरण कंपनीचे १५ केव्हीए क्षमतेचे सिंगल फेजचे तीन रोहीत्र गेल्या पंधरा दिवसापासून नादुरुस्त आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागला.

जोतिबाचीवाडी हे गाव उस्मानाबाद-अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असून, या गावची लोकसंख्या दीड हजाराच्या घरात आहे. वीज वितरण कंपनीच्या येथील उपकेंद्रमधून या गावासाठी वीज पुरवठा केला जातो. गावाला वीज पुरवठा करण्यासाठी साळुंखे वस्तीजवळ सिंगल फेजचे १५ केव्हीए क्षमतेचे तीन रोहीत्र बसविण्यात आले आहेत. परंतु, पंधरा दिवसापूर्वी हे तिन्ही रोहीत्र जळाल्याने गणपती, महालक्ष्मी या सणाच्या कालावधीमध्ये गावात अंधाराचे साम्राज्य पसरले. दुसऱ्या एका थ्री फेज ट्रान्सफार्मरवरून कधी दिवसा तर कधी रात्री फक्त आठ तास वीज पुरवठा होत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. दरम्यान, काही वीज ग्राहकांनी वीज वितरण कंपनीकडे सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी केली असता अगोदर आपल्याकडे थकित असलेले वीज बिल भरा व त्यानंतर सुरळीत वीज पुरवठा केला जाईल, असे अजब उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

चौकट........

कारवाईची मागणी

सिंगल फेजचे रोहीत्र बदलण्यासाठी काढून दुरुस्तीसाठी पाठविल्यानंतर यंत्रणेकडून पुन्हा नादुरुस्त व खराब रोहीत्र मिळत असून, बदलून आणलेले रोहीत्र बसवताच त्यामध्ये लगेचच बिघाड होत आहे. पंधरा दिवसात दोन वेळा रोहीत्र बदलून आणले तरीही अंधार कायम आहे. त्यामुळे दोषपूर्ण रोहीत्र पुरवठा करणाऱ्या संबंधित यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी माजी सरपंच बाळासाहेब जगदाळे यांनी केली आहे.