शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

पाच मिनिटांत उरकली पाहणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे झालेल्या अतिवृष्टी व मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीलगत असलेल्या क्षेत्रात पाणी घुसल्याने पिकांचे ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे झालेल्या अतिवृष्टी व मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीलगत असलेल्या क्षेत्रात पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या अनुषंगाने १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पाहणी केल्यानंतर बुधवारी औरंगाबाद येथील प्रभारी उपायुक्त वीणा सुपेकर यांनी पाहणी केली. परंतु, त्यांनी रस्त्यावर थांबून दोनच मिनिटांत पाहणी उरकल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.

पारगाव हे राष्ट्रीय महामार्गावरील मांजरा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. मांजरा नदीच्या उगम क्षेत्रात व पारगाव येथे गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे या भागातील जनकापूर, पांगरी गावचा संपर्क तुटला होता. तसेच नदीलगत असलेल्या क्षेत्रात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पारगाव येथील शेतकरी विनायक आखाडे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली होती. या वेळी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

पालकमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर बुधवारी प्रभारी उपायुक्त वीणा सुपेकर यांचा पीक नुकसानीबाबत मांजरा नदीकाठच्या गावात दौरा नियोजित केलेला होता. या दौऱ्याची वेळ सकाळी साडे दहा वाजता असल्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच वाशीचे गटविकास अधिकारी राजगुरू, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले त्यांच्या सहकाऱ्यांसह येथे उपस्थित होते. उपआयुक्त सुपेकर या साडेअकरा वाजेच्या सुमारास पारगावात दाखल झाल्या. येथे राज्य मार्गावर थांबूनच त्यांनी शेतकरी विनायक आखाडे यांच्या शेताची पाहणी केली. याच ठिकाणी दोन मिनिटांचा संवाद साधला. यानंतर जनकापूर येथील शेतकरी कौशल्या गपाट यांच्या पिकाची पाहणीही रस्त्यावर थांबून दोन मिनिटांतच उरकली व शासन ठरवेल त्याप्रमाणे मदत मिळवून देऊ, असे सांगितले. पारगाव, जनकापूर येथील पाहणी करून त्या मांजरा नदीकाठच्या गावातील पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी रवाना झाल्या. या वेळी त्याच्या सोबत वाशीचे तहसीलदार नरसिंग जाधव, मंडळ अधिकारी शिवाजी उंदरे उपस्थित होते. पाहणी दौऱ्यावेळी सरपंच महेश कोळी, उपसरपंच पंकज चव्हाण, ग्रा. पं. सदस्य राजाभाऊ कोळी, सुशांत कोकणे यांच्यासह श्रीमंत निंगुळे, अमोल गायकवाड, आर. ए. डोके, गणेश आखाडे, राजेंद्र क्षीरसागर, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

चौकट.....

अहवाल सादर...

पारगाव व जनकापूर येथील नुकसानीचा अहवाल या वेळी तलाठी किशोर उंदरे, कृषी सहायक अमोल मुळे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी उपआयुक्त वीणा सुपेकर यांना दिला. या अहवालानुसार पारगाव येथील एकूण १६६९ क्षेत्रापैकी १६४७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यातील सोयाबीनचे नुकसान ३७१ हेक्टर तर इतर पिकांचे १३ हेक्टर असे एकूण ३९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यातील पारगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ४४३ आहे. तसेच जनकापुरातील एकूण ४४७ हेक्टर क्षेत्रापैकी ४६० हेक्टरवरील सोयाबीन ८४ हेक्टर तर ८ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १३५ आहे.

कोट......

उपायुक्त येणार असल्याने सकाळपासून थांबून होतो. परंतु, त्या आल्या आणि रस्त्यावर बोलून दोन मिनिटांत गेल्या. अहवाल दिलेला आहे. सरकारच्या निर्णयाप्रमाणे मदत मिळेल, असे सांगितले. महापुराची व अतिवृष्टीची नोंद असूनही शासन का टाळाटाळ करत आहे, हे कळत नाही. त्यामुळे आजचा पाहणी दौराही केवळ फार्स होता की काय असे वाटले.

- विनायक आखाडे, शेतकरी