शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ ही सर्वांची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

उस्मानाबाद - रस्त्यावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात टाळण्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. ‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ ही ...

उस्मानाबाद - रस्त्यावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात टाळण्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. ‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शुक्रवारी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकाचे वाचन केले. यानंतर प्रत्येक मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. रस्त्यावरील अपघाताशी माझा काही संबंध नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. कारण रस्त्याशी संबंध येत नाही, असा व्यक्ती असूच शकत नाही. कोणत्या ना कोणत्याप्रकारे वाहन चालविणे, वाहनात बसणे, रस्त्यावर पायी चालणे अशाप्रकारे प्रत्येकाचा रस्त्याशी संबंध हा येतच असतो. त्यामुळे प्रत्येकाने रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहनधारकाने वाहन चालविताना सर्व प्रकारची खबरदारी घेणे, रस्ता ओलांडताना दक्ष राहणे, वाहनात बसलेल्याने वाहन चालकास वाहन जोरात चालविण्यास किंवा नियमांचे उल्लंघन करून चालविण्यास भाग न पाडणे आदी बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास अपघाती घटना टळतील, असे डाॅ. फड म्हणाले.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, कार्यकारी अभियंता (बां.) नितीन भोसले, कार्यकारी अभियंता दशरथ देवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बळीराम निपाणीकर, कृषी विकास अधिकारी डाॅ. तानाजी चिमनशेट्टे, कार्यकारी अभियंता (ल. पा.) व्ही. व्ही. जोशी आदींची उपस्थिती हाेती.