शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधितांचा आकडा पावणेतीन हजारांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST

कळंब : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता पावणे तीन हजाराच्या घरात पोहोचली असून, सध्या १५४ रुग्णांवर उपचार चालू ...

कळंब : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता पावणे तीन हजाराच्या घरात पोहोचली असून, सध्या १५४ रुग्णांवर उपचार चालू आहेत . तालुक्यात लसीकरण करणाऱ्यांची संख्याही सव्वापाच हजारांच्या पुढे गेली असली तरी त्याचा वेग वाढविण्याची आवश्यकता तज्ज्ञांमधून व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या १५४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ६६ रुग्णांवर शासकीय आयटीआयमधील कोविड सेंटर मध्ये, ८ रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत तर ८० रुग्ण घरी राहून उपचार घेत आहेत.

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज दोन अंकाच्या घरात जात आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बाधित रुग्णाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करणे, मास्कचा वापर न करणाऱ्यावर कार्यवाही करणे, शासनाने दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडे प्रशासनाने जोर लावला आहे.

तालुक्यात आतापर्यंत ७ हजार ५६१ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६ हजार १४१ निगेटिव्ह तर १ हजार ३४० पॉझिटिव्ह आल्या आहेत. ९ हजार ४०५ जणांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८ हजार १३ निगेटिव्ह तर १ हजार ३९२ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तालुक्यात एकूण २ हजार ६४४ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यापैकी २ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, सध्या १५४ जणावर उपचार सुरू आहेत.

लसीकरणाला प्रतिसाद

कोविड लसीकरणाला मागील काही दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, त्याचा वेग वाढविण्याची गरज आहे. लसीकरणाबाबत काही चुकीचे समज गैरसमज असल्याचेही समोर येते आहे. याबाबत लसीकरणाबरोबरच आता जनजागृती करण्यास शासन, प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ५ हजार २३६ जणांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. दररोज सरासरी शंभर ते सव्वाशे जण लसीकरणासाठी येत आहेत. ही संख्या वाढली तर कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींचे म्हणणे आहे.

व्यापाऱ्यांचा अर्धवट प्रतिसाद !

‘ब्रेक द चेन’ म्हणत शासनाने काही ठरावीक दुकाने वगळता इतर दुकानाना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. पण, काही व्यापाऱ्यांनी यास विरोध दर्शविला. त्या मंडळींनी शासनास निवेदनही दिले. काही व्यापाऱ्यांनी आज आपली दुकाने अर्धवट उघडी ठेवून व्यापार केला. आधीच व्यवसाय मंदीमध्ये असताना पुन्हा ब्रेक द चेन म्हणत शासनाने दुकानावर निर्बंध आणल्याने आहे तो व्यापार मोडीत निघण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत.

फळविक्रेते, भाजी विक्रेते गंभीर नाहीत

शहरातील मुख्य चौकात भाजी, फळ विक्री करणारे बहुतांश विक्रेते मास्कचा वापर करीत नाहीत. काहीजण नुसतेच नावाला मास्क अडकवितात. विशेष म्हणजे याठिकाणी लहान मुलांनाही फळे, भाजी विक्रीसाठी विनामास्कचे बसविले जाते. ही गंभीर बाब प्रशासनही गांभिर्याने घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.