शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोत ठेकेदार नको, शासकीय यंत्रणा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : ग्रामीण विकासात रोजगार हमी योजना ही मोलाची भूमिका बजावत आलेली आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत शासकीय यंत्रणा ...

उस्मानाबाद : ग्रामीण विकासात रोजगार हमी योजना ही मोलाची भूमिका बजावत आलेली आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत शासकीय यंत्रणा उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे मनुष्यबळासाठी ठेकेदार नियुक्त करण्याऐवजी पूर्वीच्याच पद्धतीने शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचारी निवडल्यास त्यांची पिळवणूक थांबेल, असा विश्वास व्यक्त करीत आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्राद्वारे साकडे घातले आहे.

रोजगार हमी योजनेने मजूरवर्गास मोठा आधार मिळालेला आहेच. शिवाय, ग्रामीण भागाच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. विशेष म्हणजे, ही योजना महाराष्ट्राने देशाला दिलेली देण आहे. असे असतानाही रोहयोची स्वतंत्र शासकीय यंत्रणा आजवर उभी राहू शकलेली नाही. ती निर्माण करण्याची गरज आहे. नुकताच शासनाने या योजनेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना योजना सुरू असेपर्यंत किंवा नियत वयोमानापर्यंत कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेऊन मोठा दिलासा आहे. हे कर्मचारी वर्षानुवर्षे योजनेची सर्व कामे यशस्वीरीत्या पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान, त्यांच्या नियुक्त्यांसाठी खासगी ठेकेदार नेमण्याऐवजी पूर्वीच्याच पद्धतीने नरेगा आयुक्तालयाच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सेतू समितीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवरही अधिकचा भार पडणार नाही व कर्मचाऱ्यांची पिळवणूकही होणार नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासोबतच स्वत:ची यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी विनंतीही आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.