शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नाेंदविले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

उस्मानाबाद - मागील आठवड्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग तसेच साेयाबीनसारख्या नगदी पिकांचे हाेत्याचे ...

उस्मानाबाद - मागील आठवड्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग तसेच साेयाबीनसारख्या नगदी पिकांचे हाेत्याचे नव्हते झाले. अशा शेतकऱ्यांनी अतिवृष्टीनंतर ७२ तासांत विमा कंपनीकडे ऑनलाईन पद्धतीने नुकसानीची नाेंद करणे बंधनकारक केले आहे. परंतु, या प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अनेकांना नाेंद करताच आलेली नाही. त्यामुळे बुधवारअखेर केवळ ४० हजार शेतकरीच नाेंद करू शकले.

पावसाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पेरणी उरकली. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पिकेही जाेमदार आली. परंतु, ही पिके वाढीच्या तसेच फुले लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने सुमारे २१ ते २५ दिवसांचा खंड दिला. त्यामुळे उडीद, मूग या कमी कालावधीच्या पिकाला पुरेशा शेंगा लागल्या नाहीत. ज्या लागल्या त्या भरल्या गेल्या नाहीत, तर साेयाबीनची वाढ खुंटली. या संकटातून हाती लागलेल्या शेतमालातून किमान उत्पादन खर्च तरी निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. उडीद, मुगाची काढणी सुरू असतानाच जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. अनेक भागांत दाेन ते तीनवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके पाण्याखाली गेली. काढणी झालेली पिके वाढून गेली. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. हाती आलेले सर्वच निसर्गाने हिरावल्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा विका कंपनीकडे लागल्या. परंतु, पूर्वीप्रमाणे महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे केले जात नाहीत. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अतिवृष्टी झाल्यापासून ७२ तासांत विमा कंपनीला नुकसान कळविणे बंधनकारक केले आहे. बहुतांश शेतकरी ऑनलाईन कळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने ॲप सातत्याने हॅंग हाेत हाेते. तसेच अन्य तांत्रिक अडचणींनाही ताेंड द्यावे लागत असे. परिणामी हाताताेंडाशी आलेला घास वाया गेला असतानाही अनेकजण विमा कंपनीला कळवू शकले नाहीत. आजवर जिल्हाभरातून केवळ ४० हजार शेतकरीच कंपनीकडे नुकसान नाेंदवू शकले. ही संख्या आणखे वाढू शकते, असे कृषी विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

चाैकट...

जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा...

जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नुकसान नाेंदविताना काेणकाेणत्या अडचणी येत आहेत? त्यावर उपाय काय? आदी बाबींचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त जे शेतकरी विमा कंपनीकडे ऑनलाईन नाेंदी करू शकले नाहीत, त्यांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.