शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाला आली ग्रामीण रस्त्याची कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

पांडुरंग पोळे (फोटो : पांडुरंग पोळे १६) नळदुर्ग : नळदुर्ग ते अक्कलकोट या महामार्गाचे काम मागील सहा वर्षांतही पूर्ण ...

पांडुरंग पोळे

(फोटो : पांडुरंग पोळे १६)

नळदुर्ग : नळदुर्ग ते अक्कलकोट या महामार्गाचे काम मागील सहा वर्षांतही पूर्ण होऊ शकले नाही. बहुतांश ठिकाणी हे काम अर्धवट अवस्थेत असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे या महामार्गाला सध्या ग्रामीण रस्त्याची कळा आली असून, वाहनधारकांना मोठी कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत.

तुळजापूर- अक्कलकोट या धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी शासनाने हा राज्य मार्ग (काही गावाच्या शिवारात हा मार्ग जिल्हा व गाव रस्ता आहे) महामार्ग म्हणून घोषित करून आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा ठेका एका कंत्राटदारास देण्यात आला आहे. ठेकेदाराने काम सुरू केल्यापासून काही शेतकऱ्यांनी हरकती नोंदवत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवाय, जिल्हा प्रशासनही याबाबत कुठलीच ठाम भूमिका घेत नसल्याने या महामार्गाचे काम आजपर्यंत खोळंबलेले आहे. जिथे शेतकऱ्यांच्या हरकती नाहीत त्या ठिकाणी ठेकेदाराने रस्ता खोदून भराव टाकून रूंदीकरण केलेले आहे. मात्र, जेथे काम अडवण्यात आले आहे, तिथे मार्ग खोदून टाकलेला किंवा अर्धवट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अनेक समस्यांना वाहन चालक व परिसरातील नागरिक तोंड देत आहेत.

दरम्यान, या परिसरात मागच्या दोन - चार दिवसांत चांगला पाऊस झाला असल्याने आहे तो रस्ताही जागोजागी खराब झाला आहे. ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाले, तेथील साईडपट्टीचे मजबुतीकरण करून दबाई करण्यात आली नाही. त्यामुळे या रस्त्यावर एकेरी वाहतूक होत आहे. समोरून एखादे अवजड वाहन आल्यास दुसरे वाहन रस्त्याच्या खाली घेता येत नाही. घेतलेच तर ते रस्त्याच्या खाली उतरून अडकून पडत आहे. बुधवारी दुपारी देखील नळदुर्गवरून अक्कलकोटकडे जाणारा टेम्पो रस्त्यावरून खाली घसरल्याने या मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. क्रेनच्या साहाय्याने टेम्पो बाजूला काढून वाहतूक सुरळीत करावी लागली. याच वेळी एसटी महामंडळाची बस अडकून पडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

कोट...........

प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम चालू आहे. परंतु, काही शेतकऱ्यांनी मावेजासाठी काम अडविल्याने ते वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. वास्तविक भारतीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार महामार्ग रस्त्याच्या बाजूला रस्त्याच्या मध्यापासून ४० मीटर अंतरापर्यंत कोणालाही परवानाधारक पक्के बांधकाम करता येत नाही की त्याचे अकृषी करून घेता येत नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरण केले किंवा जमीन अधिग्रहण करून चौपदरीकरण केले तरी या रस्त्याचे महामार्गात रूपांतर होते व कालांतराने त्या परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्व नियम लागू होतात. मात्र, याकडे जिल्हा प्रशासन व भारतीय रस्ते विकास प्राधिकरण जाणून बुजून डोळेझाक करून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे.

- भीमाशंकर मिटकरी, स्थापत्य अभियंता