शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
2
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
3
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
4
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
5
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
7
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
8
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
9
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
10
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
11
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
12
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
13
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
14
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
15
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
16
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
18
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
19
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
20
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज

कोणता झेंडा घेऊ हाती ! राज्यात ‘अनाकलनीय’ राजकारण; सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 3:08 PM

१७ सप्टेंबरनंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, किरीट सोमय्या यांनी उडवून दिलेला आरोपांचा धुरळा, त्यावरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, महाविकास आघाडीतील जाणवणारा विसंवाद यावरून संभ्रम वाढतो आहे.

- स.सो. खंडाळकरऔरंगाबाद : राज्यातील सध्याचे राजकारण गुंतागुंतीचे आणि अनाकलनीय असल्याची भावना वाढत असून, आगामी निवडणुकांपर्यंत युती व आघाड्यांची स्थिती नेमकी अशी असेल, याबाबत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ( Which flag to take! ‘Incomprehensible’ politics in the state; Activists of all parties in confusion ! ) 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thakarey ) यांनी १७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर राज्य पातळीवर सुरू झालेल्या राजकीय घुसळणीनंतर ही संभ्रमावस्था आणखी वाढली. शिवसेना - भाजप ( Shiv Sena - BJP ) एकत्र येतात की काय, अशी चर्चा सुरू झाली. चिमटे काढणे, उपहास करणे आणि टोले लगावणे हा मुख्यमंत्र्यांचा स्वभाव आहे व त्याला अनुसरूनच ते बोलले असावेत, असे काही जणांना वाटते. औरंगाबादेत वर्षानुवर्षे महापालिकेत शिवसेना व भाजपची सत्ता राहिली. शिवाय, मनपाची निवडणूक होऊ घातलेली आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज असतात आणि ती डोळ्यासमोर ठेवून राजकीय गणिते मांडत असतात. शहरात एमआयएमचा ( AIMIM ) एक मोठा दबाव गट निर्माण झाल्याने राजकारणाचा रंग बदलतो आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी युतीच्या संकेताची गुगली टाकून पाहिली असावी, असे काही कार्यकर्त्यांना वाटत आहे.

१७ सप्टेंबरनंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, किरीट सोमय्या यांनी उडवून दिलेला आरोपांचा धुरळा, त्यावरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, महाविकास आघाडीतील जाणवणारा विसंवाद यावरून संभ्रम वाढतो आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनातही काहीतरी आहे, असे वाटू लागले आहे. सरकार पाडायचं आहे; पण त्याचं पाप आमच्या पदरात नको, अशी सावध भूमिका भाजपची दिसून येते. सध्याच्या राजकारणात कोण कुणावर दबाव वाढवतोय, मुख्यमंत्री कॉंग्रेस- राष्ट्रवादीवर दबाव वाढवू इच्छित आहेत, की भाजप-राष्ट्रवादीवर, आगामी सरकार शिवसेना - भाजपचे की राष्ट्रवादी कॉंग्रेस- भाजपचे, अशा खमंग चर्चांचे पेव फुटले आहेत. ईडी, सीबीआयचा भुंगा कधी कोणत्या नेत्याच्या मागे लागेल, याचा नेम राहिला नाही. या पार्श्वभूमीवर कोणता झेंडा घेऊ हाती, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस