शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

वीज नसल्याने बावीस खेड्यांचा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: June 28, 2014 01:15 IST

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई प्रशासनाची दिरंगाई व टोलवाटोलवीच्या कारभारामुळे अंबाजोगाई व परळी तालुक्यातील पूस येथील २२ खेडी नळयोजना विद्युत बिघाडामुळे आठवडाभरापासून बंद आहे.

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाईप्रशासनाची दिरंगाई व टोलवाटोलवीच्या कारभारामुळे अंबाजोगाई व परळी तालुक्यातील पूस येथील २२ खेडी नळयोजना विद्युत बिघाडामुळे आठवडाभरापासून बंद आहे. अंबलवाडी तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही या परिसरातील २२ गावांमध्ये पाण्यासाठी ठणठणाट सुरू आहे. प्रशासनाच्या दिरंगाई धोरणाचा फटका सहन करीत ग्रामस्थांची मोठा जलस्त्रोत उपलब्ध असूनही पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच आहे.अंबाजोगाई, परळी तालुक्यातील २२ खेडयांना अंबलवाडीच्या साठवण तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी पूस येथून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या पाणीपुरवठा योजनेचा लाभ अंबलवाडी, वरवटी, पूस, गिरवली बावणे, गिरवली आपेट, तळणी, लाडझरी, अंबलटेक, तेलघना, लेंडेवाडी, दौंडवाडी, मैंदवाडी, नागदरा व परिसरातील अनेक गावांना होतो. या योजनेच्या माध्यमातून परिसरातील सर्व गावात पाणीपुरवठा योजना सुरू आहे. ही पाणीपुरवठा योजना सात वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाली. मात्र गेल्या सात वर्षात सततच्या बिघाडामुळे व विविध कारणांमुळे सात वर्षात केवळ दोन ते तीन वर्षच या योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा झाला. राज्यात सर्वत्र भीषण पाणी टंचाईवर उपाययोजना सुरू असतांना या परिसरातील ग्रामस्थांना मोठा जलस्त्रोत उपलब्ध असूनही केवळ शासनाच्या दिरंगाईचा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून अंबलवाडी ते पूस या भागाचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विद्युत पुरवठ्याअभावी पाणीपुरवठा ठप्प आहे. पाठशिवणीचा खेळ सुरूचसलग वर्षभर पाणीपुरवठा होईल, अशी हमी या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून मिळेल अशी खात्री या परिसरातील २२ गावातील ग्रामस्थांना कधीच अनुभवता आली नाही. सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणांनी ही योजना ठप्प असते. परिणामी पाण्यासाठी वणवण भटकंतीची वेळ ग्रामस्थांच्या नशिबी कायम आहे. हा पाठशिवणीचा खेळ कधी संपणार असा संतप्त सवाल पूस येथील सामाजिक कार्यकर्ते महेश गौरशेटे, वरवटी येथील रखमाजी चाटे, यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. या संदर्भात या विभागाचे कनिष्ठ अभियंता गोविंद भुजबळ यांच्याकडे विचारणा केली असता महावितरणच्या वाहिनीती बिघाडामुळे ही योजना बंद राहिली. गेल्या दोन दिवसांपासून विद्युत वाहिन्यांचा बिघाड दूर झाला असून ही योजना तात्काळ सुरू होणार असल्याचे भुजबळ ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.