शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतीत ठिबक सिंचनाचा वापर वाढला

By admin | Updated: June 26, 2014 00:38 IST

पालम : शेतीमधील पिके वाचविण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर वाढला आहे़ शेतकऱ्यांमधून ठिबकची मागणी वाढल्याने साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे़

पालम : शेतीमधील पिके वाचविण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर वाढला आहे़ शेतकऱ्यांमधून ठिबकची मागणी वाढल्याने साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे़
कापूस पिकासाठी सर्वाधिक वापर करण्यात येत आहे़ मृग नक्षत्राची सुरुवात होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही़ पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़ शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, आकाशाकडे डोळे लावून बसला आहे़ जून महिन्यात पाऊस पडेल हा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी मे महिन्याचा शेवटचा आठवडा व जून महिन्याचा पहिला आठवडा या पंधरवाड्यात कापसाची लागवड केली होती़ पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी हजारो रुपयांची बियाणे खरेदी करत कापूस लागवडीवर भर दिला होता़ लागवड केलेला कापूस चांगल्या स्थितीत आहे़ या कापसाला जोरदार पावसाची गरज आहे़ परंतु, अजूनही पाऊस पडलेला नाही़ यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच संकटात सापडला आहे़ उगवलेले कापसाचे पीक वाचविण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनचा वापर करताना दिसत आहे़ कमी पाण्यावर जास्तीत जास्त कापसाची रोपे जगावीत यासाठी परिश्रम घेतले जात आहेत़ ठिबक सिंचनचा वापर करून कापसाबरोबरच ऊस, केळी व फळबागा जोपासली जात आहेत़ मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ठिबक सिंचनाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे़ शासकीय अनुदानाची वाट न पाहता शेतकरी स्वखर्चातून ठिबक सिंचनची खरेदी करण्यात व्यस्त आहेत़ अचानक ठिबक सिंचनच्या साहित्याची मागणी वाढल्याने साहित्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे़ यामुळे ठिबकच्या साहित्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे़ (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना अनुदान मिळेना
ठिबक सिंचनचे क्षेत्र वाढावे व शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे, यासाठी ठिबक सिंचन करीता शासन शेतकऱ्यांना अनुदान देत आहे़ परंतु, मागील वर्षभरापासून अजूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही़
शेतकरी वर्ग कृषी विभाग व ठिबकच्या व्यापाऱ्यांकडे अनुदानासाठी चकरा मारून बेजार होत आहेत़ शासनाची आॅनलाईन यंत्रणा बंद असल्याने अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला नाही़
निसर्गाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे शासनाने अनुदान न देऊन नवीन संकट उभे केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ पेरणीच्या तोंडावर तरी अनुदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़