शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या बंधाऱ्याचे लोकार्पण ही दुर्दैवी बाब

By admin | Updated: August 17, 2014 01:54 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे मला कोरड्या बंधाऱ्याचे लोकार्पण करावे लागले, अशी खंत पालकमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त करीत लवकरच पाऊस पडावा, अशी प्रार्थना ईश्वरास केली.

देवगावफाटा : सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी मोठे प्रकल्प उभारणे आता सोपे नाही. त्यामुळे शासनाने जमीन संपादित न करता राज्यात एकाच वेळी साखळी सिमेंट बंधाऱ्याचे होत असलेले लोकार्पण ही निश्चितच समाधानाची बाब आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे मला कोरड्या बंधाऱ्याचे लोकार्पण करावे लागले, अशी खंत पालकमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त करीत लवकरच पाऊस पडावा, अशी प्रार्थना ईश्वरास केली.जलसंधारण आणि कृषी विभागाच्या वतीने भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या सेलू तालुक्यातील नागठाणा येथे १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. याप्रसंगी आ. रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जि.प. अध्यक्षा मीनाताई बुधवंत, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर, तहसीलदार छडीदार, राकॉँचे प्रदेश सचिव डॉ. संजय रोडगे, प्रभाकर वाघीकर, प्रतापराव सोळंके, जगन्नाथ जाधव, सोपानराव मोगल, लिंबाजी मोगल, कार्यकारी अभियंता सत्तार खान यांची उपस्थिती होती. धस म्हणाले, नजरी आणेवारीवरून दुष्काळी परिस्थितीसमोर आल्याने शासनाने संपूर्ण मराठवाडा टंचाईग्रस्त जाहीर केला. वीज बिलात ३३ टक्के सवलत, विद्यार्थी फी माफीचा निर्णय झाला असून टंचाईत पाणी, चारा याबाबतचे अधिकार तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. येथे १८ टीएमसी पाणी क्षमतेच्या बंधाऱ्यात पाण्याची साठवण झाल्यानंतर कृषी उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग होईल. परंतु शेतकऱ्यांनी मोटारपंपद्वारे पाणी घेण्याचे धाडस करू नये, दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे म्हणत माझ्या मतदार संघात तीन वर्षापासून दुष्काळ आहे. तरीही शेतकरी फळबागा जगवतात, दररोज २५०० लीटर दूध उत्पादन होते. आ. बोर्डीकरांकडे बघत आपल्या मतदारसंघात दुधाळ जनावरांची संख्या किती आहे, असे म्हणत त्यांंनी फिरकी घेतली. आ. बोर्डीकर आपल्याकडे माझं दुर्लक्ष होत आहे, असे नाही. माझ तर सोडा परंतु सेलू-जिंतूर वरच सर्वांचे लक्ष आहे, असे म्हणत कोपरखळी मारली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच चंदू मोगल, तलाठी सी.पी. वाघ, पोलिस पाटील चांदगेव मोगल यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक आबासाहेब मोगल यांनी केले. अमिता वैद्य, गिरीजा पाते यांंनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)