शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘आवडेल तिथे प्रवास’ महागला

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

हिंगोली : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेच्या दरात जूनपासून वाढ झाली.

हिंगोली : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेच्या दरात जूनपासून वाढ झाली. मागील दरांपेक्षा आता जवळपास १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने आवडीच्या ठिकाणाचा प्रवास प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत आहे. परिणामी पर्यटन किवा देवस्थानची परिक्रमादेखील आता महागात पडणार आहे. कायम तोट्यात असल्याचा शिक्का राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. याची तथ्यता कितपत आहे, याबद्दल साशकंता वाटते; परंतु तोट्याच्या नावाखाली परिवहन महामंडळाकडून सातत्याने दरांत वाढ केली जाते. अलीकडच्या तीन वर्षांत जवळपास दुप्पटीने सर्वच भाड्यांत वाढ झाली. नियमित अंतराने ही वाढ सुरूच असताना पुन्हा प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली. आता ‘आवडेल तिथे प्रवास’ प्रत्येकाला चांगलाच महागात पडणार आहे. आगाराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एसटीचा वर्धापन दिन साजरा करताना हळूच राज्य परिवहन महामंडळाने दरात वाढ केली. परिणामी ४ दिवसांच्या प्रवासासाठी ६५० रूपयांवरून आता ८०० रूपये मोजावे लागतात; पण कमी गर्दीच्या कालावधीत ४ दिवसांसाठी प्रौढांसाठी ७४० तर मुलांसाठी ३७० रूपये मोजावे लागतात. प्रामुख्याने वर्षाची विभागणी दोन गटांत केली असून १५ आॅक्टोबरपासून ते १४ जूनपर्यंत गर्दीच्या कालावधीत तिकीटांचे वाढीव दर राहणार आहेत. उलट कमी गर्दीच्या १५ जूनपासून ते १४ आॅक्टोबरपर्यंत तिकीटांत थोडासा दिलासा मिळाला. दुसरीकडे ७ दिवसांच्या प्रवासासासाठी प्रौढांना साध्या बससाठी १ हजार ४०० तर मुलांसाठी ७०० रूपये भरून प्रवास करता येणार आहे. निमआराम बससाठी प्रौढांना १ हजार ६०५ तर मुलांसाठी ८०५ रूपये ७ दिवसांच्या प्रवासासाठी भरावे लागतात. सात दिवसांच्या आंतरराज्यीय प्रवासासाठी १ हजार ७३० तर मुलांसाठी ८६५ रूपये भरून प्रवास करता येणार आहे. गर्दीच्या कालावधीसाठी या तिकीटांच्या दरांपेक्षा कमी गर्दीच्या हंगामात आगाराने थोडासा दिलासा दिला. आगाराचे दर वाढत जात असल्याने प्रवासांच्या खिशाला चाट पडत आहे. इतर वाहतूकीच्या तुलनेत एसटीचे भाढे वाढत राहिल्याने प्रवाशांना बसचा प्रवास डोईजड होतना दिसतो. महामंडळाच्या वाढीव दराचा फायदा हिंगोली आगारास होण्याची शक्यता आहे. इतर वाहतूक नसल्यामुळे प्रवाशांना बसशिवाय पर्याय नसल्यामुळे उत्पन्न वाढीची आशा आहे. (प्रतिनिधी)कायम तोट्याच्या नावाखाली राज्य परिवहन महामंडळाकडून सातत्याने दरांत वाढ केली जाते असताना अलीकडच्या तीन वर्षांत जवळपास दुप्पटीने सर्वच भाड्यांत झाली वाढ. आगाराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एसटीचा वर्र्धापन दिन साजरा करताना हळूच परिवहन महांडळाने केली दरात वाढ. प्रामुख्याने वर्षाची विभागणी दोन गटात केली असून १५ आॅक्टोबरपासून ते १४ जूनपर्यंत गर्दीच्या कालावधीत तिकीटांचे वाढीव दर राहणार आहेत. उलट कमी गर्दीच्या १५ जुनपासून ते १४ आॅक्टोबरपर्यंत तिकीटांत थोडासा दिलासा मिळाला. आता चार दिवसांच्या प्रवासासाठी ६५० रूपयांवरून आता ८०० रूपये मोजावे लागतात; परंतु कमी गर्दीच्या कालावधीत ४ दिवसाच्या प्रवासासाठी प्रौढांना ७४० तर मुलांसाठी ३७० रूपये मोजावे लागतात. सात दिवसांच्या प्रवासासाठी प्रौढांना साध्या बससाठी १ हजार ४०० तर मुलांसाठी ७०० रूपये भरून करता येणार प्रवास.