शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती रेल्वे रिकामीच रवाना

By admin | Updated: May 17, 2014 01:13 IST

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून अचानकपणे बंद करण्यात आलेली औरंगाबाद- तिरुपती रेल्वेची सेवा शुक्रवारी दुपारी ३ वाजता कोणतीही घोषणा न करताच सुरू करण्यात आली

 औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून अचानकपणे बंद करण्यात आलेली औरंगाबाद- तिरुपती रेल्वेची सेवा शुक्रवारी दुपारी ३ वाजता कोणतीही घोषणा न करताच सुरू करण्यात आली. त्यामुळे तिला प्रवाशांचा अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. मोजके प्रवासी आणि रिकाम्या डब्यांसह रेल्वे औरंगाबाद स्थानकावरून रवाना झाली. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे औरंगाबाद- तिरुपती ही रेल्वे बंद करण्यात आली होती; परंतु उन्हाळी हंगामातील वाढणार्‍या प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेतर्फे औरंगाबाद- तिरुपती रेल्वेची घोषणा करण्यात आली; परंतु ही घोषणा रेल्वे रवाना होण्याच्या केवळ एक दिवस आधी करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला होता. एका दिवसात कोणतेही नियोजन करण्याची वेळ दक्षिण मध्य रेल्वेने दिली नाही. त्यातही लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झालेला दिसून आला. त्यामुळे रेल्वेस्थानकावर ही रेल्वे आल्यावर प्रवाशांची संख्या अत्यंत कमी दिसून आली. जवळपास तीन डब्बे पूर्णपणे रिकामे होते, तर उर्वरित डब्यांमध्ये अनेक जागा रिकाम्या होत्या. औरंगाबादहून ही रेल्वे जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, निजामाबाद, सिकंदराबाद, विजयवाडामार्गे तिरुपतीला पोहोचणार आहे. त्यामुळे अनेक प्रवासी जालना, परभणी, पूर्णा, नांदेडसाठी बसले होते. रेल्वेची घोषणा अचानक केल्यामुळे प्रवासाचे नियोजन करण्यात धावपळ झाल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. शनिवारी ५.१० वाजता ही रेल्वे तिरुपतीहून औरंगाबादसाठी रवाना होईल. पन्नास टक्के अचानक घोषणा केल्यामुळे एका दिवसात प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळणार असा प्रश्न होता; परंतु ‘एसी’सह स्लीपर कोचमध्ये जवळपास ५० टक्के प्रवाशांनी आरक्षण केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.