शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी ‘रोल मॉडेल’ व्हावे

By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST

औरंगाबाद : शिक्षकांनी आदर्श समाज निर्मितीचे ‘रोल मॉडेल’ बनावे, असे प्रतिपादन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

औरंगाबाद : विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आणि सुसंस्कृत करणे हा शिक्षकांचा धर्म आहे. त्याचा विसर न पडू देता शिक्षकांनी आदर्श समाज निर्मितीचे ‘रोल मॉडेल’ बनावे, असे प्रतिपादन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण समारंभात डॉ. नारनवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उच्च शिक्षण क्षेत्रात अध्ययन, अध्यापन व संशोधनाचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ प्राध्यापकांना विद्यापीठाने शिक्षकदिनी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. या समारंभात जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे व कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या हस्ते विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक तथा मौलाना आझाद अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. हमीद खान, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.डी. शिरसाट, संगणकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती गवळी, रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. बापू शिंगटे, याशिवाय संलग्नित महाविद्यालयातील ५ प्राध्यापकांपैकी जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचे डॉ. नारायण बोराडे, देवगिरी महाविद्यालयाचे डॉ. एस. एम. हेळंबे, अंबड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद पंडित, उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. संजय अस्वले व बीड येथील बलभीम महाविद्यालयाचे डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉ. नारनवरे म्हणाले की, आजचे विद्यार्थी हीच राष्ट्राची संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. विद्यापीठामध्ये सर्व भौतिक सुविधा आहेत; पण विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, इच्छाशक्ती नसेल तर संशोधनामध्ये अपेक्षित काम होणार नाही. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. ते राष्ट्रहितासाठी लाभदायी ठरेल. यावेळी कुलगुरू डॉ. कोणत्याही देशाच्या निर्मितीमध्ये शिक्षकांचे योगदान मोठे राहिलेले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांत शिक्षक दिन साजरा करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. भारतात प्राचीन काळापासून शिक्षकांचे योगदान राहिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षकांसाठी अध्ययन, अध्यापन व संशोधन ही तीनच कामे आयुष्यभर केली पाहिजेत. बाबासाहेबांच्या या विचाराने शिक्षकांनी विद्यापीठाची प्रतिमा उंचाविली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजेश करपे यांनी मानले.