शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

आवडीच्या क्षेत्रातच शिक्षण घ्यावे

By admin | Updated: June 1, 2014 00:26 IST

लोकमत : एस्पायर एज्युकेशन फेअरचे थाटात उद्घाटन

नांदेड : आवड असलेल्या क्षेत्रातच विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे असा सल्ला पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी दिला़ लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर होते़ पालकमंत्री सावंत म्हणाले, लोकमतने पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकी जपली आहे़ विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील संधीबद्दल लोकमतने सतत ४ वर्षांपासून माहिती उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे, लोकमत योग्यवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे़ आता १२ वीचा निकाल लागणार असून १२ वीनंतरच्या शैक्षणिक संधी विद्यार्थ्यांना कळणार आहेत़ लोकमतच्या या उपक्रमात आपणही गेल्या ४ वर्षांपासून सहभागी असून पुढील वर्षी मंत्री नसलो तरी शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचा सचिव म्हणून मी या उपक्रमात निश्चितपणे असेल, असेही सावंत यांनी स्पष्ट केले़ विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या क्षेत्रात शिक्षण घ्यावे़ २१ व्या शतकातील ती गरज आहे़ काम करताना त्या क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान घ्यावे़ येणार्‍या काळात ज्ञानाचा वापर करून व्यवहार करणारेच यशस्वी होणार आहेत़ त्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचीही गरज असल्याचे पालकमंत्री सावंत यांनी सांगितले़ अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ़ विद्यासागर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधीबाबत पालक सध्या गोंधळलेले असताना लोकमतचे हे प्रदर्शन विद्यार्थी व पालकांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले़ लोकमतच्या या शैक्षणिक प्रदर्शनीत पुणे, पंढरपूर आदी भागातील संस्था सहभागी झाल्या आहेत़ याचा अर्थ या भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता निश्चितच मोठी आहे़ असे शैक्षणिक उपक्रम हे वर्षभर टिकवणे ही बाबही आवश्यक असल्याचे ते म्हणाले़ ज्ञान हे केवळ शैक्षणिक संस्थेतच मिळते असे नाही तर बाहेर आल्यानंतरही ते घेत रहावे़ असे शैक्षणिक वातावरण तयार करण्याची गरज आहे़ त्यासाठी शैक्षणिक उपक्रम वाढविणे आवश्यक असून विद्यार्थी, पालकांचाही त्यात सहभाग आवश्यक आहे़ विद्यापीठही यासाठी प्रयत्न करीत आहे़ एक शिक्षक- एक कौशल्य आणि एक विद्यार्थी -अनेक कौशल्य ही योजना विद्यापीठांतर्गत राबविण्यात येत आहे़ समाजाच्या विकासासाठी सर्व प्रकारचे कौशल्य विकसित करावे लागतील, असेही कुलगुरू डॉ़ विद्यासागर यांनी स्पष्ट केले़ शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी आता खूप संधी उपलब्ध आहेत़ त्यांचा लाभ घेण्याची गरज आहे़ जागतिक पातळीवरही शैक्षणिक पॅटर्न बदलला आहे़ आता शिक्षणाचे आयाम बदलले असून कुठे शिकता याला महत्व नाही तर काय शिकता, याला महत्व आहे़ क्षमता वाढविल्यास जगातील कोणत्याही स्पर्धेत आपण टिकू शकता, असेही डॉ़ विद्यासागर यांनी स्पष्ट केले़ यावेळी अ‍ॅड़ संजय रूईकर यांनीही नांदेडमधील शैक्षणिक क्षेत्रातील संधीबाबत तसेच व्होराईजन डिस्कव्हरी अकॅडमी, रत्नेश्वरी इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक आदी संस्थाबद्दल माहिती दिली़ मंचावर लोकमतचे सहायक सरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांची उपस्थिती होती़ प्रास्ताविकात लोकमतचे उपवृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे यांनी लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरच्या आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली़ सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सपना भागवत यांनी केले़ यावेळी पालक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते़