शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीला स्थगिती; निवडणूक आता वॉर्ड पद्धतीनेच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 13:13 IST

प्रभाग आरक्षण सोडतीला राज्य शासनाची स्थगिती 

ठळक मुद्देशिवसेनेच्या गोटात आनंदोत्सवसेनेचा काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत सत्तेचा इरादा

औरंगाबाद : एप्रिल २०२० मध्ये प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली होती. बुधवारी १८ डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाची सोडतही निश्चित झाली होती. आज दुपारी अचानक राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीला स्थगिती दिली. त्यामुळे महापालिका निवडणूक जुन्या वॉर्ड पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आयोगाने घेतलेल्या आजच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाची लाट पसरली आहे.

प्रभाग निवडणुकीत आजपर्यंत भाजपला चांगलाच फायदा झाला आहे. त्यादृष्टीने औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने घ्यावी, असा भाजपचा आग्रह होता. तत्कालीन भाजप सरकारने त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाला सूचना दिल्या होत्या. मागील काही दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनुसार मनपाकडून प्रारूप आराखडा तयार करून घेतला. १८ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रभाग आरक्षणासंदर्भात सोडतही आयोजित करण्यात आली होती. 

राज्यातील महाआघाडीच्या सरकार स्थापनेनंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी महापालिका निवडणूक पूर्वीप्रमाणेच म्हणजेच वॉर्ड पद्धतीने घ्यावी, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला होता. आज दुपारी अचानक महापालिकेला राज्य निवडणूक आयोगाकडून एक पत्र प्राप्त झाले. १८ डिसेंबर रोजी प्रभाग रचनेच्या आरक्षणासाठी काढण्यात येणारी सोडत पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हे पत्र आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना पाठविले आहे.

शिवसेनेच्या गोटात आनंदशहरात ११५ वॉर्ड आहेत. २०१५ मध्ये मनपा निवडणुकीत सेनेने स्वबळावर २९ उमेदवार निवडून आणले होते. भाजपचे २३ उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेने महाआघाडी स्थापन केली आहे. आगामी मनपा निवडणूकही महाआघाडीनुसारच होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मनपात सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा सेनेचा आहे. 

भाजप बॅकफूटवरमागील काही दिवसांपासून भाजपने महापालिकेत शिवसेनेची चारही बाजूने कोंडी करणे सुरू केले आहे. १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ सर्व भाजप नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामे सादर केले आहेत. प्रभाग निवडणुकीच्या प्रक्रियेतही भाजपने आपली सोय करून घेतल्याचे बोलले जात होते. त्यावर आज शिवसेनेने पाणी फेरण्याचे काम केले.

सर्वत्र एकच पद्धत हवीराज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. औरंगाबादेतही प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली होती. आता पुन्हा वॉर्ड पद्धतीकडे जाणे चुकीचे आहे. भाजपला यामुळे काही फरक पडणार नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री, राज्य निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे.             -अतुल सावे, आमदार, भाजप

आम्हाला निवडणूक सोपी; पद्धत कोणतीही चालेलशिवसेनेला प्रभाग निवडणुकीचा फारसा त्रास नव्हता. आमच्यासाठी निवडणूक महत्त्वाची असते. आमचे नगरसेवक, कार्यकर्ते सदैव जनतेच्या संपर्कात, सेवेत असतात. त्यामुळे निवडणूक सोपी आहे. वॉर्ड पद्धतही आम्हाला चालेल. मी अद्याप राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय बघितला नाही. उद्या बघणार आहे. - प्रदीप जैस्वाल, आमदार, शिवसेना

...तर सेनेची कोंडी             प्रभाग पद्धती शिवसेनेला अवघड गेली असती. काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यांना निवडणूक लढवावी लागेल. तिन्ही पक्षांचे चिन्ह वेगळे आहेत. त्यामुळे त्यांची कोंडी झाली असती. एमआयएमला प्रभाग, वॉर्ड कोणतीही पद्धत चालेल.- शेख अहेमद, जिल्हाध्यक्ष, एमआयएम.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस