शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेरीस जिल्ह्यात लागणार सहाशे टँकर

By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST

औरंगाबाद : खालावलेली भूजल पातळी आणि सिंचन प्रकल्पांमधील अत्यल्प पाणीसाठा यामुळे जिल्ह्यास लवकरच भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

औरंगाबाद : खालावलेली भूजल पातळी आणि सिंचन प्रकल्पांमधील अत्यल्प पाणीसाठा यामुळे जिल्ह्यास लवकरच भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी मार्चअखेरीस तब्बल सहाशे टँकरची गरज भासू शकते, अशी माहिती आज पालकसचिव संजयकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत समोर आली. जिल्ह्याचे पालकसचिव तथा अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीला विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरुवातीला टंचाईची सद्य:स्थिती आणि संभाव्य परिस्थितीची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवळ ६२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे आॅगस्टपासून पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्यात १४ गावांना २२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दिवसेंदिवस खालावत जाणारी भूजल पातळी आणि लघु व मध्यम प्रकल्पातील अत्यल्प साठा यामुळे येत्या काळात भीषण टंचाई भासणार आहे. मार्चअखेरपर्यंत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ६०० टँकरची गरज भासण्याची शक्यता आहे. १निसर्गाने पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. त्याचा पीक पेरणीवरील परिणाम उत्पादकतेच्या स्वरूपात दिसून येतो. म्हणून पावसावर आधारित पीक पेरणीचा कालावधी ठरविल्यास उत्पादनात घट येणार नाही, असे पालकसचिव संजयकुमार म्हणाले. २नेहमी उद्भवणाऱ्या पीक परिस्थितीवर काही उपाययोजना कराव्या लागतील. पिकांना कमी पाण्यात पोषण देणाऱ्या हायड्रोपॉलिमरचा वापर करता येतो का हे पाहावे. हायड्रोपॉलिमर हे जमिनीवर आच्छादले जाते व ते आयात करावे लागेल. ३त्याचप्रमाणे हायड्रोफोनिक्स या तंत्रज्ञानाचा वापर हरितगृहात केल्यास तृणधान्य चांगले घेता येते याचाही वापर करता आल्यास पाहावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.