शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

Shiv Sena-BJP tussle : जालना रोडवर उड्डाणपूल बांधण्यावरून शिवसेना-भाजपात ‘सोशल’ वॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 3:42 PM

गेल्यावर्षी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर जालना रोडवरील उड्डाणपूल विमानतळासमोर ऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याचे ठरले होते.

ठळक मुद्देविमानतळासमोरचा पूल अमरप्रीत चौकात बांधण्याची भाजपाची मागणीशिवसेनेने आजवरच्या अपघाताचे दाखले देत पुलाची जागा योग्य म्हटले

औरंगाबाद: नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने जालना रोड पुनर्बांधणीच्या ४०० कोटींच्या मूळ प्रस्तावाला फाटा देत फक्त ७४ कोटींचा निधी दिला असून त्यातून जालना रोडच्या साईडड्रेनसह उड्डाणपुलांचे काम करण्यात येणार आहे. विमानतळासमोर उड्डाणपूल प्रस्तावित असून तो पूल अमरप्रीत किंवा आकाशवाणी चौकात बांधण्याची गरज आहे. यासाठी सोशल मीडियातून भाजपानेच विरोध सुरू केला आहे. त्यात शिवसेनेने उडी घेत विमानतळासमोरच पूल बांधणे गरजेचे असल्याचे सांगून आजवरच्या अपघाताचे दाखले सोशल मीडियातून दिले आहेत.

गेल्यावर्षी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर जालना रोडवरील उड्डाणपूल विमानतळासमोर ऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याचे ठरले होते. क्रांतीचौक येथील उड्डाणपुलाला जोडून मोंढा नाक्यापर्यंत नवीन पूल ‘लँड’ करण्याचा निर्णय झाला होता. परंतु अमरप्रीत चौकात पूल बांधणे शक्य नाही. तेथे अंडरग्राऊंडला जलवाहिन्यांचे मोठे जाळे आहे. ते जाळे विस्कळीत झाल्यास ५० वसाहतींच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होईल. अमरप्रीत चौकात होणारा पूल तांत्रिक दृष्ट्या सुरक्षित असेल की नाही, याबाबत एनएचएआयच्या यंत्रणेला साशंकता होती. त्यामुळे पूल पुन्हा विमानतळासमोरच बांधण्याचे निश्चित झाल्याचे एनएचएआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

विमानतळासमोरील पूल का केला होता रद्दविमानतळासमोर जास्त वाहतूक नसते असा अहवाल वाहतूक पोलिसांनी दिला होता. अमरप्रीत चौकात बीडबायपास, दर्गा रोडवरून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तेथे पूल प्रस्तावित करण्याबाबत तत्कालीन प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी विभागीय बैठकीत सांगितले होते.

भाजपाचा विरोध असाभाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत देसरडा यांनी सोशल मीडियातून विमानतळासमोरील पुलाला विरोध केला आहे. वाहतुकीचा विचार करता अमरप्रीत किंवा आकाशवाणी चौकात हा पूल बांधण्यात यावा. विमानतळासमोर पुलाची गरज नसून नागरिकांनी त्याला विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रकरणी देसरडा यांनी सांगितले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. दोन्ही ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या पूल बांधणे शक्य आहे.

शिवसेनेने दिलेले उत्तर असेशिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज गांगवे यांनी सोशल मीडियातूनच विमानतळापासून रामनगरपर्यंत किती अपघात झाले आहेत, वाहतूक किती आहे याचे दाखले दिले आहेत. केंद्रात सरकार भाजपाचे आहे, त्यामुळे भाजपाने शहरासाठी आणखी दोन पुलांसाठी निधी आणावा असे आव्हानही दिले आहे. विमानतळासमोरील पुलाचे लोकेशन आता पुन्हा बदलले तर या भागातील सर्व वॉर्डातील नागरिकांसह आंदोलन उभारण्याचा इशारा गांगवे यांनी दिला..

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादBJPभाजपा