शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

घरचे बियाणेच फायदेशीर

By admin | Updated: May 11, 2014 00:40 IST

परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे़

परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासू शकतो़ परंतु, शेतकर्‍यांनी स्वत:कडील घरचे बियाणे वापरले तर ते त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे़ मागील हंगामात सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात सोयाबीन काढणीच्या काळातच वादळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली़ त्यामुळे उत्पादन घटले व त्याचा बियाणाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे़ येत्या हंगामात सोयाबीन बियाणांची कमतरता पडण्याची शक्यता आहे़ शेतकर्‍यांनी विविध कंपन्यांचे विक्रीसाठी आलेल्या सोयाबीन बियाणांचा आग्रह न धरता स्वत:कडील बियाणे वापरावेत़ खरीप हंगामासाठी गेल्यावर्षी प्रमाणिक बियाणांपासून घेतलेल्या सोयाबीनच्या उत्पन्नातून स्वत:कडील बियाणे पेरणीसाठी वापरावेत़ सोयाबीनच्या पेरणीसाठी प्रतीहेक्टरी ७५ किलो ग्रॅम म्हणजेच एका एकरला ३० किलो बियाणे लागते़ यात सूत्राप्रमाणे क्षेत्रानुसार पेरणीपूर्वी बियाणे उपलब्ध करून स्वच्छ करून ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) तीन वर्षे वापरता येते बियाणे सोयाबीन हे स्वपराग सिंचित पीक असून, पेरलेल्या वाणाचे गुणधर्म व त्यापासून उत्पादित सोयाबीन बियाणे यामध्ये अधिक तफावत आढळत नाही़ सोयाबीन पिकाच्या लागवडीमध्ये वापरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाण असल्याने बियाणे प्रत्येक वर्षी बदलण्याची गरज नसते़ एकदा प्रमाणित बियाणे पेरल्यानंतर त्यापासून उत्पादित सतत तीन वर्षांपर्यंत वापरता येते़ उगवणशक्तीची तपासणी सोयाबीन पिकाच्या बियाणात अंकुर हे आवरणालगतच असून ते अतिशय नाजूक असते़ बाहेरून होणार्‍या आघातामुळे बियाणास नुकसान होऊन त्याची उगवण क्षमता कमी होण्याची शक्यता असते़ त्यामुळे सोयाबीनचे बियाणे असणारे पोते उंचीवरून फेकू नये किंवा बियाणे आदळणार नाही, याची काळजी घ्यावी़ मागील वर्षी उत्पादित घरचे बियाणे वापरणार असल्यास त्याची उगवणक्षमता तपासणे आवश्यक आहे़ ही उगवणक्षमता घरच्या घरी तपासता येते़ यासाठी आपण जे सोयाबीन बियाणे वापरणार आहोत त्यातून काडी कचरा निवडून बिया मोजून घ्याव्यात़ हे बियाणे ओले कापड किंवा रद्दी पेपरमध्ये ४ ते ५ दिवसांसाठी गुंडाळून ठेवावे़ बियाणे ठेवलेल्या कापडावर किंवा पेपरवर एक-दोन दिवसाआड पाणी हलके शिंपडावे़ बियाणे उगवण्यासाठी सोयाबीन पिकास चार-पाच दिवस लागतात़ पाच दिवसानंतर बियाणे अंकुरल्यास ठेवलेले कापड किंवा पेपर काढून त्यातील उगवण झालेल्या सोयाबीनच्या बियाणांची संख्या मोजावी़ सोयाबीन पिकासाठी उगवणशक्ती किमान ७० टक्के असावी़ म्हणजे अंकुरण्यासाठी टाकलेल्या १०० पैकी किमान ७० बियांची उगवण होणे आवश्यक आहे़ घरचे बियाणे वापरताना अशा प्रकारे उगवण क्षमता तपासणीतून योग्य असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन वनामकृविने केले आहे़