शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

संजय शिरसाटांची सायकल विरोधी ‘ट्रॅक’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST

औरंगाबाद : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी १६ जानेवारी रोजी उद्‌घाटन केलेल्या क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावरील सायकल ...

औरंगाबाद : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी १६ जानेवारी रोजी उद्‌घाटन केलेल्या क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावरील सायकल ट्रॅकला शिवसेना आ. संजय शिरसाट यांनीच विरोध केला असून, या ट्रॅकमुळे वाहतूक आणि व्यवसायांचा फज्जा उडत असल्याचे सांगत विरोधी ‘ट्रॅक’वर चालण्यास सुरुवात केली आहे.

शहरात सुवर्णपथ योजनेतून क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता सुमारे ३५ कोटी रुपयांतून बांधण्यात आला. वाहतुकीच्या दृष्टीने हा एकच रस्ता शहरात सुरक्षित होता. मात्र, आता तेथेही सायकल ट्रॅक आणल्यामुळे व्यावसायिकांंना आणि विशेषकरून चारचाकी वाहनधारकांना हा रस्ता अडचणीचा ठरू लागला आहे. व्यावसायिकांच्या मनात असलेल्या खदखदीला आ. शिरसाट यांनी विरोधाची भूमिका घेऊन वाट मोकळी करून दिली आहे.

पर्यटनमंत्री ठाकरे १६ जानेवारी रोजी शहरात येण्यापूर्वी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री देसाई यांच्याकडे सायकल ट्रॅकमुळे त्या रस्त्यावरील व्यापाऱ्यांचे आणि वाहतुकीचे कसे नुकसान होऊ शकते, हे समजावून सांगितल्याची माहिती आहे. शिवाय जेथून ट्रॅक गेला आहे, त्याखालून ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी गेलेली आहे, अशी माहितीही देण्यात आली होती. हे सर्व समोर असताना पालिका प्रशासन तेथे सायकल ट्रॅकची संकल्पना का राबवत आहे, असा प्रश्न काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर उपस्थित केला होता. आ. शिरसाट यांनी देखील पालकमंत्र्यांच्या कानावर ही बाब टाकली होती.

हा ट्रॅक चुकीचा आहे. यातून पुढे त्रास होणार आहे. मात्र, सायकल ट्रॅकच्या उद्घाटन कार्यक्रमाची पत्रिका तयार झाल्यामुळे त्या दिवशी काही करता आले नाही, असे सांगत आ. शिरसाट यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

चौकट...

दिवसातून दहा सायकलीही जात नाहीत

यासंदर्भात आ. शिरसाट म्हणाले, त्या सायकल ट्रॅकमुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्याऐवजी अडचणींत वाढ झाली आहे. याबाबत सोमवारी पालिका प्रशासक यांना पत्र देणार आहे. संबंधित ट्रॅकमधून दिवसभरात दहा सायकलीही जात नाहीत. रस्ता अरुंद झाला आहे. चारचाकी वाहनांची पार्किंग रस्त्यावर येत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी रुंदीकरणात जागा दिली, त्यांनी व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका प्रशासकांच्या मनात आले आणि त्यांनी केले; परंतु त्याचा त्रास सर्वांना होऊ लागला आहे. त्यामुळे हा ट्रॅक तातडीने काढून घेतला पाहिजे.

- आ. संजय शिरसाट