शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
2
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
3
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
4
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
5
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
6
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
7
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
8
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
9
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
10
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
11
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
12
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
13
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
14
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
15
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
16
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
17
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
18
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
19
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
20
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्र की डम्पिंग ग्राऊंड?

By admin | Updated: May 27, 2014 00:59 IST

जालना : शहरातून वाहणार्‍या सीना आणि कुंडलिका नद्यांच्या पात्रात प्रचंड प्रमाणात कचरा आणून टाकला जात असल्यामुळे या नद्या आहेत की डंपींग ग्राऊंड हा प्रश्नच पडला आहे.

जालना : शहरातून वाहणार्‍या सीना आणि कुंडलिका नद्यांच्या पात्रात प्रचंड प्रमाणात कचरा आणून टाकला जात असल्यामुळे या नद्या आहेत की डंपींग ग्राऊंड हा प्रश्नच पडला आहे. एकीकडे पर्यावरणप्रेमींकडून नद्या वाचविण्यासाठी विविधस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. गतवर्षी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन दोन्ही नद्यातील कचरा, झाडे आदी सफाई केली होती. परंतु आजघडीला दोन्ही नद्यांच्या पात्रात कचर्‍याचे ढिगार लागले आहेत. नद्याच्या काठांना अतिक्रमणांचा विळखा घातला आहे. गतवर्षी भीषण दुष्काळामुळे जालनेकरांना पाण्याची किंमत कळाली. त्यामुळेच जलसंवर्धनासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. घाणेवाडी जलसंरक्षण मंचाने येथील कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले. त्याचे परिणाम आज समोर आहेत. बंधारे तुडूंब भरलेले आहेतच. शिवाय पाच कि़मी.च्या परिसरातील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फारच कमी नागरिकांना पाण्याची टंचाई भासली. भविष्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून आजही प्रयत्न होत आहेत. परंतु शाश्वत स्त्रोत असलेल्या दोन्ही नद्या आजही दुर्लक्षितच आहेत. दोन्ही नद्यांना नाल्या,गटाराचे स्वरूप आले आहे. परिसरातील नागरिक कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आणून टाकण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांचे पात्र उथळ, अरूंद होत आहे. पालिकेकडून सुशोभिकरण सोडाच पण पात्र प्रदूषित करण्यासाठी मोठा हातभार लावला जात आहे. पालिकेचे अनेक कर्मचारी बिनधास्त नदीपात्राचे डंपिंग ग्राऊंड करीत आहेत. नदीपात्रातील दोन्ही बाजंूना मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. कायम दुर्गंधी असते. कचर्‍यासोबतच काटेरी झुडुपे, मोठी झाडे, कॅरिबॅगचा ढिग पडलेला आहे. नदीपात्रातही काठावरील वस्त्या, नगरांमधून सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होत आहे. तसेच नद्यांना गटाराचे स्वरूप आले आहे. या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत पात्रांची सफाई केली परंतु आज जैसेथे परिस्थिती असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेने या प्रमुख जलस्त्रोतांचे जतन केल्यास पाणीटंचाई निर्माण होणार नाही. परिसरातील पाणीपातळीतही वाढ होईल, अशी आशा पर्यावरणप्रेमींतून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) शहराच्या दोन्ही बाजूला नदीपात्रांमध्ये अतिक्रमण झाले आहे. पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो. काहीनी तर पक्के बांधकाम केल्याचेही दिसून येते. लाखो रुपये खर्च करुन घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र प्रकल्पाची अवस्था बिकट बनली आहे, प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुुरु झालेला नाही. प्रकल्पाचे तीन तेरा वाजले. नदीपात्रांमधून कचरा व पाणी प्रदूषित होण्याला नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. घरा-घरांमधून साठलेला कचरा प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून या ठिकाणी आणून टाकण्यात येतो. त्यामुळे प्लास्टीकच्या पिशव्या ठिकठिकाणी अडकलेल्या दिसतात. नागरिकांनीही पर्यावरण व जलस्त्रोतांची काळजी घेण्याची गरज आहे. अशा प्रकारचा कचरा, प्लास्टीक पिशव्या या पात्रांत टाकू नये अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.