शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार पाणी वापराला बसणार लगाम

By admin | Updated: August 19, 2014 02:08 IST

नांदेड: पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराला आठवड्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे़ उपलब्ध असलेले

 

नांदेड: पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराला आठवड्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे़ उपलब्ध असलेले ९ दलघमी पाणी दोन दिवसाआड सोडल्यास दीड महिना पुरणार आहे़ अशा वेळी नागरिक पेयजलाचा वापर बांधकाम, वाहने धुणे, अंगण स्वच्छता करणे व पाळीव प्राणी धुण्यासाठी करत असल्याचे चित्र समोर आले आहे़ या पार्श्वभूमीवर महापालिका पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पथक स्थापन करून पाणी बचतीचे धोरण राबविणार आहे़ नांदेडकरांना यापुर्वी पाणीटंचाईची झळ पावसाळ्यात कधीच बसली नाही़ विष्णूपुरी प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे नांदेडकरांच्या घशाला कोरड कधीच पडली नाही़ मात्र यंदा पावसाने पाठ फिरविल्याने प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे़ त्यामुळे पाण्याविषयी सर्वांनाच आपल्या दैनंदिन सवयीत बदल करावा लागणार आहे़ महापालिकेने यापुर्वीच पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असले तरी याचे गांर्भीय नागरिकांनी अद्याप घेतले नाही़ मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची नासाडी थांबविल्यास संभाव्य पाणी टंचाईवर मात करता येईल़ त्यासाठी आता नागरिकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे़ सध्या दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येते़ हे साठविलेले पाणी शिळे झाले म्हणून दुसऱ्या दिवशी फेकून दिले जाते़ हे चुकीचे आहे़ खरे तर व्यवस्थित झाकून ठेवल्यास पाणी खराब होत नाही़ ही जागृती महापालिका, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय स्तरावर होणे आवश्यक आहे़ (प्रतिनिधी) नांदेड शहराला सध्या दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येतो़ मात्र विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीपातळी घटल्याने महापालिका लवकरच आठवड्यातून एक वेळेस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेणार आहे़ जिल्हादिवसाआड पाणीपुरवठा लातूर - १० परभणी - ८ उस्मानाबाद - ४ जालना - ८ औरंगाबाद - ३ हिंगोली - ४ बीड - ८ पाणी बचतीचे उपाय बादलीत पाणी घेऊन आंघोळ केल्यास १८ लिटर पाणी लागते़ शॉवरखाली आंघोळ केल्यास कमीत कमी १०० लिटर पाणी वापरले जाते़ नळ सोडून दाढी केली तर १० लिटर; मगमध्ये पाणी घेतल्यास एक लिटऱ नळ उघड ठेवून ब्रश केले तर १० लिटर; मगमध्ये पाणी घेतल्यास १ लिटर, वाहत्या नळाखाली कपडे धुताना ११६ लिटर पाणी लागते, तर बदलीचा वापर केला तर ३६ लिटर लागते़ ४मोटार धुण्यासाठी पाइपचा वापर केला तर १०० लिटर पाणी लागते़ परंतु कपडा बादलीत भिजवून कार धुतली तर १८ लिटर पाण्यात काम होते़ वाहत्या नळाखाली हात धुतले तर १० लिटर, मगमध्ये पाणी घेतले तर अर्धा लिटऱ घरगुती कामासाठी अशा पाणी बचतीचा अवलंब केल्यास प्रत्येक व्यक्तीला ८०़५ लिटर पाणी पुरते़ नेहमीच्या पद्धतीने प्रत्येकाला ३६६ लिटर पाणी लागते़ म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागे २८५़५ लिटर पाण्याच बचत होऊ शकते़ प्रत्येक कुटुंबात पाच व्यक्ती गृहीत धरल्या तर दर दिवशी १ हजार ४२७ लिटर, तर महिन्यात ४५ हजार ८२५ लिटर पाणी वाचवू शकतो़ हे केल्यास - १) पिण्याच्या पाण्यासाठी छोटे ग्लास केल्यास पाण्यात बरीच बचत होते़ अनेक वेळा मोठ्या ग्लासमधील अर्ध्यापेक्षा जास्त पाणी फेकूनच दिले जाते़ २) टाकी भरल्यानंतर जादा पाणी बाहेर पडण्यासाठी पाइप बसवला तर टाकी भरली हे समजल्याबरोबर नळ लगेच बंद केल्यास पाण्याची नासाडी होणार नाही़ ३) घरातील नळ थेंब थेंब गळत असतो़ त्याकडे आपण दुर्लक्ष करतो़ अशा गळतीमुळे २४ तासांत सुमारे ४- ५ लिटर पाणी वाया जाते़